( ३१२ )
जावें भेटीला विचारीले मनीं । हे सिद्धी साधनी नव्हे कोणा ॥ ५६ ॥
अनुतापें झाला मंतप्त मानसीं । ह्मणे सिद्धाईसी खेव आला ॥ २७ ॥
तव बोलती प्रवुद्ध त्यासीचि आणावें । अहो मुळ पाठवावें सिद्धराया
॥ ५८ ॥ सर्व सत्ता तुम्हा आहे जी स्वाधीन । राजे प्रजाजन आहे
माजी ॥ २९ ॥ तव म्हणती चांगदेव नव्हे हा विनार । आज्ञेचा वडिवार
कोणागीं ॥ ३० ॥ वंचूनियां काळा रक्षीले शरीर । वहुत
दिस भार वाढविला ॥ ६ ॥ परी हे सामर्थ्य नाहीं आम्हां आंगीं ।
जावें भेटीलागीं हेंची मय ।। ६२ ॥ जन्माचे मार्थक सिद्धाचीये भेटी ।
होईल या तुदी संसारेमी ॥ ६३ ॥ परी सिद्धपणा येईल उणीव । काय
कीने जीव तळमळी ॥ ६४ ॥ ते ह्मणती देवा हे नव्हे सय वार्ता ।
म्हैमा केवी वदता होईल वेदा ॥ ३६॥ आणि मृतस्वर्गवासी पीतर कैसे
येती । ते भोजने करूनि जाती हेही मिथ्या ॥ ६६ ॥ स्वामीसी
विश्वास वाटे भलतीयाचा । परी ही नव्हे माचा वर्तमान ॥ ६७ ॥ नाहीं
ये बातेंसी साक्ष पडताळा । वोलीयेला वाचाळ मिथ्या द्विज ।। ६८ ॥
तया म्हणती चांगदेव रे प्रश्न म्या पाहिला । तो ही उतरला यथार्थ-
पणे ॥ ६९ ॥ तों शिष्य म्हणती देवा प्रश्नहीं चुकतो । नसांपडतां
जातो वेळाकाळ ॥ ७० ॥ हे ऐकोनि तयासी सिद्ध म्हणती तुम्ही
मूर्ख । अरे विद्या आहे चोख पढीत माझीं ॥ ७१ ॥ तर ते म्हणती
देवा अणवावी वार्ता । पैठणीहुनी तत्वतां धाडाने शिष्य ॥ ७२ ॥
विद्यार्थीया म्हणती जारे प्रतिष्ठाना । आणी में वर्तमान आणा
यथातथ्य ॥ ७३ ॥ चीरंजीव सकळ क्षेत्रवासी द्वीज । आशिर्वाद
माझा लिहा पत्रीं ॥ १४ ॥ नवले हे ऐकीलें रेडा बोलवीला । निगमा
क्षरी केला घोष तेणें ॥ ७५ ॥ स्वर्गस्थ पीतर आणूनि जेवविले ।
पुनरपी बोलचीले स्वर्गाप्रती ॥ ७६॥ साच की हे मिथ्या धाडावे
लिहूनी । तें ऐकावया मनी उत्कंठीत ॥ ७७ । सांगती शिष्यासी जाऊनी
त्वरीत । यावें शिघ्रवत वरावरी ॥ ७८ ॥ चालीले तेथूनी सत्वर
ब्राह्मण । ते पावले पैठण गंगातीरा ॥ ७९ ॥ ऐकोनी चांगदेवें पाठ-
विलें पत्र । मिळाले सर्वत्र क्षेत्रवासी ॥ ८० ॥ धुतवस्त्रावरी गोधुमाची
राशी । मांडिले पत्रासी पूजा केली ।। ८१ ॥ आलिंगीलें पत्र कंठीं ऊरी
शिरीं । वाचीले समग्र श्रवण केलें ॥२॥कळला अभिप्राय विस्मये दाटले।
ते सिद्ध आठवले बाळ वेषी ।। ८३ ॥ फुदती गाळिती उभय नत्र जीवन ।
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/353
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
