पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्था आणि माणूस

  भारतीय समाजजीवनाची एक विशेषता आहे. इथं सारं व्यक्तीकेंद्रित आहे. घरापासून राष्ट्रापर्यंत व्यक्ती बदलली की कार्य, पद्धती, परिणाम बदलतात. अलीकडे शिवाजी विद्यापीठाचा चेहरा बदलतो आहे. त्याचं कारण विद्यापीठाला लाभलेलं दूरदर्शी नेतृत्व. कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंंखे यांना कुलगुरू झालेल्या पहिल्या दिवसापासून मी जवळून पाहात आलो आहे.
  सतत नवा विचार करायचा. काळाच्या पुढे जाऊन पाहायचं. विकासाची सामूहिक कल्पना करायची. प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचं. राजकारण, गट, तट यांना बगल द्यायची. काम करणारी माणसं हेरायची. त्यांना स्वातंत्र्य द्यायचं. सकारात्मक दृष्टी ठेवायची. हे सारं करताना संस्थात्मक शिस्त सांभाळायची. कोणाही व्यक्तीबद्दल मनात किल्मिष ठेवायचं नाही. दूरचं पाहायचं. सूक्ष्म नियोजन करायचं. कार्यवाहीत मात्र सूट नाही द्यायची. त्यांच्या या साऱ्या गुणविशेषतांमुळे विद्यापीठ म्हणजे नव उपक्रमांचं ऊर्जा केंद्र झालं.
 विद्यार्थ्यांचं ऐकलं जाऊ लागलं पण ऐकण्यात विवेक पाळण्यात आला. लोकप्रिय घोषणांपेक्षा लोकहिताचा विचार महत्त्वाचा मानण्यात आला. शिकू इच्छिणाऱ्याला मार्ग मिळाला.'मागेल त्याला काम' योजना अंमलात आली. विद्यापीठाचे संगणकीकरण झालं.

 एकविसाव्या शतकास साजेसं तंत्रज्ञान प्रशासनात आलं तसं अधिविभागातही! पहिल्या दिवसांपासून विभागात तास होण्याचा चमत्कार घडला. प्राध्यापकांचं प्रगती पुस्तक तयार झालं. ते विद्याथ्र्यांनी तयार

जाणिवांची आरास/७७