पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकविसाव्या शतकातील आचारसंहिता

१. पूर्वजांच्या पुण्याईवर जगण्याचा काळ संपल्यात जमा असल्यानं एकविसाव्या शतकात प्रत्येकानं स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
२. एकविसावे शतक कार्यसंस्कृतीचे असल्याने प्रत्येकाने प्रत्येक काम मनस्वीपणे केलं पाहिजे.अनिच्छेने पाट्याच टाकल्या तरी देशाची व स्वतःची भरपूर प्रगती होणे सहज शक्य आहे.
३. हे शतक वैश्विकतेकडे झेपावणारं असल्यानं आपण संकुचितपणा सोडून व्यापकतेचा छंद जपायला हवा
४.‘तंत्रशिक्षण' या शतकाचा मंत्र असल्याने कोणत्याही शाखेचे शिक्षण तंत्रशुद्ध घेतल्याशिवाय पर्याय नाही, याचे भान हवे.
५. गतिशीलतेचे वरदान घेऊन जन्मलेले एकविसावे शतक माणसापुढे ताण-तणावाचे आव्हान उभे करत असताना तणावमुक्त जीवन जगण्याची कला आपण आत्मसात करायला हवी.
६.‘व्यक्तिस्वातंत्र्य' हा या शतकाचा वेद असल्याने दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची वृत्ती आपण अंगीकारायला हवी.
७. धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार नि जातीअंताचा प्रारंभ हे एकविसाव्या शतकाचे वैशिष्ट्य असल्याने आपण नियती, परंपरेपेक्षा समकालीन नवसभ्यतेचा पुरस्कार करायला हवा.
८.तर्कशुद्ध जीवनपद्धतीचं हे शतक होणार असल्याने आपले सारे आचार-विचार विज्ञानाधिष्ठित व्हायला हवेत.

जाणिवांची आरास/६३