पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहणार. कारण त्यात वैश्विकता, मानवतावाद, आदर्श आशावाद, समता, बंधुतासारखी कालातीत मूल्यं आहेत.
 आज जागतिकीकरणात सामान्य मनुष्य भरडला जात आहे. म्हणून ते थोपवलं पाहिजे असे म्हणणारे साहित्यिक डॉ. अनिल अवचट व जागतिकीकरण ही काळाची गरज आहे म्हणणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर या दोहोंच्या विधानात प्रस्तुतता असली तरी एकात भाबडा मानवतावाद आहे तर दुस-यात देशाच्या प्रगतीचं भविष्यलक्ष्यी स्वप्न नि महत्त्वाकांक्षा आहे.
 आज आपला भारत देश जागतिक महासत्ता होतो आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आर्थिक प्रगतीचा दर स्थिर राहावा म्हणून कोण मेहनत घेत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हिंदी शिका म्हणतात. कारण अमेरिकेचं भारतावरचं परावलंबन वाढत आहे. सर्वांमागील प्रस्तुतता शोधून आपण आपले विचार व व्यवहार ठरविले पाहिजेत. भारत कायाकल्पाच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारताचं बदलतं चित्र पाहन स्टीफन स्वाईगचं आत्मचरित्र ‘द वर्ल्ड ऑफ येस्टर डे' आठवतं. त्यात ही कायाकल्पाचं अपूप आहे. तो म्हणतो -

 "My Today and each of my yesterdays, my rise and falls are so divers that I sometimes feel as if I lived not one but several existences, each one different from the other."

जाणिवांची आरास/२०