पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 होती. पुणे, मुंबई, नाशिक, चौक, चाफळ, रत्नागिरी अशा गावांतून नोकरीची आमंत्रणं असताना मी पिंपळगाव (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. जेव्हा पिंपळगाव हे दुसरे शिरोडेच होते. १९७१ ते ७९ या आठ वर्षांत मी समर्पित, सेवाभावी शिक्षक होतो. याची प्रचिती मला परवा एका सुखद धक्क्याने दिली. मी सन १९७३ मध्ये मुक्त सैनिक हायस्कूल कोल्हापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होतो, तेव्हाची सर्व मुले अचानक मला न सांगता; पण परस्पर चौकशी करून दत्त. १० मुले व १० मुली. सन १९७३ मध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकणारे ते विद्यार्थी, तेव्हा ते १५ वर्षांचे नि मी २३ वर्षांचा तरुण शिक्षक. त्यांच्या नि माझ्या वयात ७-८ वर्षांचेच अंतर. परवा आले ते त्यांची साठी साजरी करायला. म्हणजेच काय, तर पाया पडायला नि मी शिकवलेली एक कविता ‘जग हे असार सुनती हूँ, मुझको सुखसार दिखलाता है' महादेवी वर्मांची कविता साठीतल्या साच्या मुला-मुलींनी एका तालसुरात म्हटली. तेव्हा ४० वर्षांनंतर ते १५ वर्षांचे होते नि मी २३ वर्षांचा एक साम्य होतं.
 मी आयुष्यभर हिंदीचा प्रचार करत राहिलो. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता अन् परवा अचानक महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने १ लाख रुपयांचा ‘अखिल भारतीय महाराष्ट्र भारती जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणेने सुवर्णमहोत्सव पुरस्कार देऊन सन्मानित केले. तोही एक सुखद धक्काच म्हणायचा. अनपेक्षित पुरस्कार हे तुमच्या दीर्घ समर्पणाचे फलित असते. आजपर्यंत १० लाखाचे पुरस्कार मिळाले, पुरस्कार ठेवून धन मात्र समाजासाठी समर्पित केले.

जाणिवांची आरास/१७२