पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पादचारी मार्ग अनिवार्य व्हायला हवेत. प्रदूषण नियंत्रण हा मोठा आरोग्याचा प्रश्न म्हणून पुढे येईल.
 भारतात आर्थिक दारिद्र्यापेक्षा कल्पना व नियोजनाचं दारिद्र्य मोठं आहे. प्रश्न निर्माण झाल्यावर आपण सोडवत राहतो. प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून नियोजन करण्याकडे आपला कटाक्ष नाही. जो आहे तो भविष्यवेधी वा लक्षवेधी नाही. यासंदर्भात युरोपचा आदर्श घ्यायला हवा. आवली टाटाची नॅनो मोटार गाडी बाजारात आली तिने मोटारींच्या बाजारात जसं एक नवं वादळ आणलं तसं सामान्यांच्या मनातही तिन नवं स्वप्नवादळ निर्माण केलं आहे. नॅनो'मुळे बाजारात अशाच लहान मोटारींचा सुळसुळाट होणार हे उघड आहे. 'मारुती'मुळे भारतात छोट्या गाड्यांचं युग सुरू झालं. त्यामुळे मोटार ही मोठ्यांची मिरासदारी न राहता सामान्य मध्यमवर्गीयांच्या ती आवाक्यात आली. तरी ती किमतीच्या अंगाने उच्चवर्गीयांचीच राहिली. नॅनोमुळे शिक्षक, लेखनिक, पोलीस, कनिष्ठ अभियते, प्रोग्रामर असे निन्ममध्यवर्गीय मोटारमालक होतील हे उघड आहे. दोनचाकीची जागा चारचाकी घेणार त्यामुळे नवे सामाजिक प्रश्न निर्माण होणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्याची गरज नाही.
  तिच्यामुळे रस्ते, पार्किंग, प्रदूषण मोटारींच्या किमतीचे युद्ध पेट्रोलचा प्रश्न अशी समस्या निर्माण होतील. सध्याचे आपल्या शहरातील गावातील रस्ते इतके अरुद आहेत की गावच्या लोकसंख्येनुसार गावातील रस्त्याची रुंदी, लांबी, वळणे, कुपणाची उंची, दुभाजक, पादचारी मार्ग याबाबत राष्ट्रीय धोरण व नियोजनाचा प्रश्न वादळाचे रूप धारण करील. मी या मोटारींचा विरोधक नाही पण मोटारींची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेता रस्त्याचे नियोजन हा कळीचा मुद्दा बनेल.
 दुसरा प्रश्न वाहतुकीची कोंडी आणि त्यातून होणारी दिरंगाई हा असेल. जुन्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबरोबर उपनगरातील व नव्या वसाहतीतील रस्त्यांची रुंदी आताच वाढवली पाहिजे. रस्त्यांवर दुभाजक, नियंत्रक, सिग्नल, पादचारी मार्ग अनिवार्य व्हायला हवेत प्रदूषण नियंत्रण हा मोठा आरोग्याचा प्रश्न म्हणून पुढे येईल.

 भारतात आर्थिक दारिद्र्यापेक्षा कल्पना व नियोजनाच दारिद्रय मोठं आहे. प्रश्न निर्माण झाल्यावर आपण सोडवत राहतो. प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून नियोजन करण्याकडे आपला कटाक्ष नाही जो आहे तो भविष्यवेधी

जाणिवांची आरास/१२४