पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऽप्रस्तावना *. त्यांतील सिद्धान्त ध्यानांतठेवण्यासहेि त्यामुळे सोपें पडेल असा हीं संस्कृत वचनें देण्याचा दुसराहि पोटहतु आहे. तथापि सर्वच वाचक संस्कृत जाणणार असण्याचा संभव नसल्यामुळे, एकंदर ग्रंथाची रचना अशी ठेविली आहे की, संस्कृत न जाणणारा वाचक संस्कृत श्लोक सोडून देऊन ग्रंथ वाचूं लागल्यास त्याच्या वाचनांत अर्थाचा कोटेंहेि खंड पडू नये. यामुळे संस्कृत श्लोकाचे शब्दशः भाषांतर न देतां कित्येकदां त्यांतील सारांश देऊनच निर्वाह करून घ्यावा लागला आहे. परंतु मूळ श्वलोक नहमीच वर दिलेला असल्यामुळे या पद्धतीनें कोणताहि गैरसमज होण्याची भीति रहात नाहीं. कोहिनूर हिन्याची अशी गोष्ट सांगतात कीं, तो हिदुस्थानांतून विलायतेंत नेल्यावर तेथे त्याचे पुनः नवे पैलू पाडण्यांत आले; व त्यामुळे तो आधक तेजस्वी दिसू लागला. हिच्यास लागूं पडणारा ही न्याय सत्यरूपी रत्नासहेि लागू पडतो. गीतेंतील धर्म सत्य व अभय खरा; पण तो ज्या काली ज्या स्वरूपानें सागण्यात आला त्या देशकालादि परिस्थितींत पुष्कळ फरक पडल्यामुळे, कित्येकांच्या डोळ्यात त्याचे तेज आतां पूर्वाप्रमाणे भरत नाहीसें झाले आहे. कोणतें कर्म चांगले व कोणतें वाईट हें ठरविण्यापूर्वी, कर्म करावें किंवा नाही हा सामान्य प्रश्नच ज्या काळी महत्त्वाचा समजत असत, तेव्हा गीता सांगितलेली असल्यामुळे, त्यांतील बराच भाग आतां कित्येकांस अनवश्यक वाटतो; आणि त्यावरच आणखी निवृतिमागीय टीकाकारांचे सारवण पडल्यामुळे गीतेंर्ताल कर्मयोगाचे विवेचन सध्याचे काळीं पुष्कळांस दुबांध झाले आहे. शिवाय आधिभौतिक ज्ञानाची अर्वाचीन कालीं पाश्चिमात्य देशांत जी वाढ झाली आहे त्यामुळे अध्यात्मशास्राला धरून केलेलीं प्राचीन कर्मयोगाची विवेचनें हल्लींच्या कालास पूर्णपणें लागूं पडणे शक्य नाहीं, अशीहि कित्येक नव्या विद्वानांची समजूत झालेली असत्ये. हे समज खर नव्हेत, असें दाखविण्यासाठी गीतारहस्यातील विवेचनांतच गीतेच्या सिद्धान्तांच्या जोडीचे पाश्चात्य पंडितांचे सिद्धान्त आम्हीं जागेोजाग संक्षेपानें दिले आहत. वास्तविक पाहिले तर गीतेंतील धर्माधर्मविवेचनास या तुलनेनें अधिक बळकटी येत्ये असें नाहीं. तथापि अर्वाचीन काली झालेल्या आधिभौतिक शास्राच्या अश्रुतपूर्व वाढीनं ज्यांची दृष्टि दिपून गेली आहु, किंवा सध्यांच्या एकदेशीय शिक्षणपद्धतीमुळे नीतिशास्राचा आधिभौतिक म्हणजे बाह्य दृष्टीनें विचार करण्यास जे शिकले आहेत, त्यांस या तुलनेवरून एवढे स्पष्ट कळून येईल कीं, मोक्षधर्म व नीति हे दोन्ही विषय आधिभौतिक ज्ञानाच्या पलीकडचे असल्यामुळे प्राचीन काळी आमच्या शास्रकारांनों या बाबतीत जे सिद्धान्त केले आहेत त्यांच्या पुढे मानवी ज्ञानाचा गति अद्याप गेलेली नाहीं, इतकेंच नव्हे तर पाश्चिमात्य