पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० गीतारहस्य अथवा कमैयेोग. लोकांच्या शत्रंकडे जाऊन त्यांस मिळाला. व “तुम्हांस मी कधाहि अंतर देणार नाहीं” असें त्यानें त्यांस अभिवचन दिले. नंतर कांहीं काळानें या शत्रूच्या मदतीनें रोमन लोकांवर चाल करून मुलुख जिंकीत जिंकींत खुद्द रोम शहरच्या दरवाजापुढे त्याच्या सैन्याची छावणी येऊन पडली. तेव्हां रोम शहरच्या स्त्रियांनीीं करॉयलेनसची बायके व आई यांसपुढेकरून मातृभूमीसंबंधानें त्याचे कर्तव्य काय याचा त्यास उपदशकेला, व रोमन लोकांच्यूशत्रूस त्यानें दिलेलें अभिवचन त्यास मोडावयास लाविलें ! कर्तव्याकर्तव्याच्या मोहांतं पडल्याची अशा प्रकारचीं दुसरीहि उदाहरणें जगाच्या प्राचीन किंवा अर्वाचीन इतिहासांत पुष्कळ आहेत. पण इतक्या दूरवर जाण्याचे आपणांस कारण नाहीं. आपला महाभारत हा ग्रंथ अशा प्रकारच्या प्रसंगांची एक खाणच आहे म्हटलें तरी चालेल. ग्रंथारंभों (आ.२) भारताचे वर्णन करितांना खुद्द व्यासांनी “सूक्ष्मार्थन्याययुक्ते,”“अनेकसमयान्वितं,” अशी त्यास विशेषणें देऊन, त्यांत सर्व धर्मशास्र, अर्थशास्त्र व मोक्षशास्र ही आली आहेत इतकेंच नव्हे, तर या बाबतींत “यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित्”यांत आह तेंच इतर ठिकाणी आहे, आणि यांत नाहीं तं दुसरे कोठेहि नाहीं (आ. ६२.५३)-असें त्याचे महत्त्व गाइलें आहे. किंबहुना, संसारांतील अनेक अडचणींच्या प्रसंगीं थोरथोर प्राचीन पुरुषांनी कसें वर्तन केलें याचा कथानकाच्या सुलभ रूपानें सामान्य जनांस बोध करण्यासाठींच भारताचे ‘ महा-भारत ? झालेले आहे; एरवीं नुस्त्या भारतीयुद्धाचे किंवा ‘जय' नामक इतिहासाचे वर्णन करण्यास अठरा पर्वे सांगण्याची कांहीं जरूर नव्हती. कोणी असा प्रश्न करीलकी, श्रीकृष्णार्जुनांची गोष्ट सोडा; पण तुम्हांआम्हांस इतक्या खोल पाण्यांत शिरण्याची जरूरकाय? मन्वादिकस्मृतिकारांनी आपआपल्या काय ? कोणाचा हिंसा अगर घातपात करूं नका, नीतीनें वागा, खरें बोला, वडील वृ गुरु यांचा मान ठेवा, चोरी किंवा व्यभिचार करूं नका, वगैरे सर्व धर्मातून सर्वासघालून दिलेल्या सामान्य मर्यादा जर पाळिल्या, तर मग तुमच्या या भानगडींत पडण्याचे कारण काय ? पण उलट असेंहि विचारितांयेईलकीं, जगांतील यच्चयावत् लोक जीपर्यंत या मर्यादेनें वागूं लागले नाहींत तोपर्यंत या लुच्च्या त्यांच्या प्रतिकारार्थ जशास तसें होऊन आपला बचाव करावा ? शिवाय हे सामान्य नियम जरी नित्य व प्रमाण मानिले तरी कत्यौ पुरुषांवर पुष्काळदां असे प्रसंग येतात कीं ज्या ठिकाणीं या सामान्य नियमांपैकीं दोन किंवा अधिक नियमांची एकसमयावच्छेदकरून प्राप्ति होत्ये; आणि मग “हें करूं का तें करूं” अशा