पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

З о र्गातारहम्य अथवा कर्मयोग देशांतहि अध्यात्मदृष्टया या प्रश्नांचा ऊहापोह अद्याप चालू असून सदर आध्यात्मिक ग्रंथकारांचे विचार गीताशास्रांतील सिद्धान्तांहून फारसे भिन्न नाहीत. गीतारहस्याच्या निरनिराळ्या प्रकरणांतील तुलनात्मक विवेचनावरून ही गोष्ट स्पष्ट होईल. परंतु हा विषय अत्यंत व्यापक असल्यामुळे पाश्चात्य पंडितांच्या मतांचा जो सारांश ठिकठिकाणी आम्हीं दिला आहे, त्याबद्दल येथे एवढे सांगणे जरूर आह की, गीतार्थ प्रतिपादन करणें हेंच आमचे मुख्य काम असल्यामुळे गीतेंतील सिद्धान्त प्रमाण धरून मग त्यांशा पाश्चिमात्य नीतिशास्रज्ञाचे किंवा पंडितांचे सिद्धान्त कितपत जुळतात हें दाखविण्यापुरताच आम्ही पाश्चिमात्य मतांचा अनुवाद केलेला आहे, व तोहेि अशा बेतानें केलेला आहे का, सामान्य मराठी वाचकांस त्यांतील मतलब लक्षांत येण्यास काठण पडू नये. अर्थात् दोहींमधील बारीक भेद, -आणि हे पुष्कळच आहेत,-किंवा या सिद्धान्तांचे पूर्ण उपपादन व विस्तार ज्यास पहुाणे असेल त्यानें मूळ पाश्चात्य ग्रंथच पाहिले पाहिजेत, हें निर्विवाद आहे. कर्माकर्मविवेक किंवा नीतिशास्र यावर पहिला पद्धतशीर ग्रंथ आरिस्टाटल नांवाच्या ग्रीक तत्त्वज्ञानें लिहिला, असें पाश्चिमात्य विद्वानांचे म्हणणें आहे. पण आमच्या मतें आरिस्टाटलच्याहि पूर्वी त्याच्यापेक्षां अधिक व्यापक व तात्त्विकदृष्टया या प्रश्नांचा विचार महाभारतांत व गीतेंत केलेला असून, अध्यात्मदृष्टया गीतेंत प्रतिपादन केलेल्या नीतितत्त्वांपेक्षां दुसरं निराळे नीतितत्त्व अद्याप निघालेले नाही. संन्याश्याप्रमाणें राहून तत्त्वज्ञानाच्या विचारांत शान्तपणानें आयुष्य घालविणें बरें, किंवा अनेक प्रकारच्या राजकीय उलाढाली करणें वरें, याचा आरिस्टाटलनें केलेला खुलासा गीतेंत असून, मनुष्य जें कांहीं पाप करितो तें अज्ञानानेंच करितो असें जें साक्रेटीसाचे मत त्याचाहेि एक प्रकारें गीतेंत समावेश झालेला आहे. कारण, ब्रह्मज्ञानानें बुद्धि सम झाल्यावर त्याचे हातून कोणतेंच पाप घडणे शक्य नाही असा गतेिचा सिद्धान्त आहे. पूर्णावस्थेस पोचलेल्या परम ज्ञानी पुरुषाचे जें वर्तन तेंच नीतिदृष्टया सर्वास कित्त्याप्रमाणे प्रमाण होय, हें एपिक्युरिअन व स्टोइक पंथांतील ग्रीक पंडितांचे मतहि गीतेस ग्राह्य असून, या पंथांतील लोकांनी केलेलें परम ज्ञानी पुरुषाचे वर्णन व गीतेंतील स्थितप्रज्ञाचे वर्णन ही दोन्ही एकसारखीच आहेत. तसेंच प्रत्येकानें सर्व मानवज्ञातीच्या हितार्थ झटणें हीच काय ती नीतीची पराकाष्ठा किंवा कसेोटी असें जें मिल्ल, स्पेन्सर, केॉट-इत्यादि आधिभौतिकवाद्यांचे म्हणणे, त्याचाहि गीतेंत वर्णिलेल्या स्थितप्रज्ञाच्या “सर्वभूतहिते रतः” या बाह्य लक्षणांत संग्रह झालेला असून कुीन्ट्_ व्_प्रीघ्र यांची नीतिशास्राची उपपात व इच्छास्वातंत्र्याबद्दलचे सिद्धान्तहि गीतेंत उपनिषदांतील ज्ञानाच्या आधारें दिलेले आहेत. गीतेंत यापेक्षां कांहीं जास्त नसतें तरीहि