पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयोग

दिवस श्रीकृष्णांस अशी विनंती केली कीं, "युद्धारंभी तुम्ही केलेला उपदेश मी विसरलो; मला तो कृपा करून फिरून सांगा." तेव्हां, "सदर उपदेश त्या प्रसंगी अत्यंत योगयुक्त चित्तानें केला असल्यामुळें तो पुनः तसाच सांगणे मलाहि अशक्य आहे!" असें भगवंतांनी त्यास उत्तर दिलें, म्हणून अनुगीतेच्या आरंभी म्हटलें आहे (मभा. अश्वमेध. अ. १६ श्लो.[टंकनभेद] १०-१३). वास्तविक पहिले तर, भगवंतांस अशक्य असें काहीच नाही; पण त्यांनी सुद्धा गीता पुनः सांगणें अशक्य म्हणावे, यावरून गीतेची थोरवी केवढी मोठी आहे हें मात्र चांगले व्यक्त होतें. वैदिकधर्मातील भिन्नभिन्न संप्रदायांस वेदांप्रमाणे हा ग्रंथ आज सुमारें अडीच हजार वर्षे, - सर्वास एकसारखाच - मान्य व प्रमाणभूत होऊन बसला आहे, यांतील बीजहि हेंच असून, याच कारणास्तव -

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः ।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥

"सर्व उपनिषदें याच कोणी गायी, भगवान् श्रीकृष्ण हे स्वतः दूध काढणारे (गवळी), बुद्धिमान अर्जुन हा (त्या गायीस पान्हा आणणारा) भोक्ता वत्स, आणि (अपूर्व सामग्री जुळत आल्यावर) जें दूध काढिलें तेंच हें मोठें गीतामृत," - असें या स्मृतिकालीन ग्रंथाचे गीताध्यानांत अलंकारयुक्त पण यथार्थ वर्णन केलें आहे. हिंदुस्थानातील सर्व प्राकृत भाषांत याची अनेक भाषांतरे, टीका अथवा निरूपणें झालीं आहेत यांत कांही आश्चर्य नाही. पण पाश्चीमात्यांस[टंकनभेद] संस्कृताची ओळख झाल्यानंतर ग्रीक, लॅटीन, जर्मन, फ्रेंच, इंग्रजी वगैरे त्यांच्या भाषांतूनहि गीतेची अनेक भाषांतरे होऊन या अप्रतिम ग्रंथाची प्रसिद्धी आज सर्व जगभर झालेली आहे. सर्व उपनिषदांचे सार या ग्रंथांत आलें आहे इतकेच नव्हे, तर या ग्रंथाचें पुरें नांवहि 'श्रीमद्भगवद्गीता-उपनिषत्'[टंकनभेद] असें आहे. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी अध्यायसमाप्तिदर्शक जो संकल्प असतो त्यांत "इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु[टंकनभेद] ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे" इत्यादि शब्द असतात. हा संकल्प मूळ भारतांत जरी दिलेला नाही, तरी गीता ग्रंथाच्या सर्व प्रतींत तो आढळून येत अस-


मागील पानासाठी संदर्भसाचा:पुनर्लेखन
त्याचेच पुढे अर्जुन व श्रीकृष्ण हे दोन अवतार झाले, असें महाभारतांत वर्णन आहे (मभा. उ. ४८.७-९ व २०-२२; आणि वन. १२१.[खात्रीचेटंकन?]४४-४६. यानींच निष्कामकर्मपर नारायणीय किंवा भागवत धर्म प्रथम प्रवृत्त केला असल्यामुळे सर्व भागवतधर्मीय ग्रंथांत आरंभीं यांसंच नमन केलेलें असते. या श्लोकात व्यासाचें नांव कांहीं ठिकाणीं गाळून त्याबद्दल 'चैव' असा पाठ येत असतो; पण आम्हांस तसे करणे बरोबर वाटत नाहीं. कारण, नररारायण ऋषींनीं भागवतधर्म जरी प्रवृत्त केला आहे, तरी भारत व गीता असे जे या धर्माचे दोन मुख्य ग्रंथ ते ज्यांनीं लिहिले त्या व्यासांसहि आरंभीं नमन करणें आमच्या मतें योग्य आहे. 'जय' हें महाभारताचें प्राचीन नांव आहे ( मभा. आ. ६२.२०).