ॐ तत्सत,
श्रीमद्भगवद्गीतारहस्य[टंकनभेद]
अथवा
कर्मयोगशास्त्र.
प्रकरण १ लें
विषयप्रवेश.
नारायणं नमस्कृत्य नरं चैवं नरोत्तमम् ।
देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥[१]
श्रीमद्भगवद्गींता[टंकनभेद] हा आमच्या धर्मग्रंथांपैकीं एक अत्यंत तेजस्वी व निर्मल हिरा आहे. पिंडब्रह्मांडज्ञानपूर्वक आत्मविद्येची गूढ व पवित्र तत्त्वें थोडक्यांत पण असंदिग्ध रीतीनें सांगून त्यांच्या आधारें मनुष्यमात्रास आपल्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची म्हणजे परम पुरुषार्थाची ओळख करून देणारा, आणि त्याबरोबरच भक्तीची ज्ञानाशी व अखेर या दोहोंचीहि शास्त्रतः प्राप्त होणाऱ्या व्यवहारांशीं सोपपत्तिक व सुंदर जोड घालून संसारात भांबावून गेलेल्या मनास शांत आणि विशेषतः निष्काम कर्तव्याचरणास प्रवृत्त करणारा, यासारखा दुसरा बालबोध ग्रंथ संस्कृतातच काय पण जगांतील इतर वाङ्मायांतहि[टंकनभेद] सांपडणे दुर्मिळ होय. केवळ काव्याच्या दृष्टीने जरी याचें परीक्षण केलें, तरी आत्मज्ञानाचे अनेक गहन सिद्धांत प्रासादिक भाषेने आबालवृद्धांस सुगम करणारा आणि ज्ञानयुक्त भक्तीरसानें भरलेला हा ग्रंथ उत्तम काव्यांत गणिला जाईल. मग सकल वैदिक धर्माचें सार श्रीभगवंताचे वाणीने ज्यांत सांठविलें गेलें त्याची योग्यता काय वर्णावी ? भारतीय युद्ध समाप्त होऊन श्रीकृष्ण व अर्जुन प्रेमानें गोष्टी बोलत बसले असतां भगवंतांचे मुखाने गीता पुनः ऐकण्याच्या इच्छेनें अर्जुनानें एक
* या संदर्भाचा मूळग्रंथाच्या पृष्ठ २ (विकिस्रोतातील पान ३४) वरील उर्वरीत भाग
|
---|
त्याचेच पुढे अर्जुन व श्रीकृष्ण हे दोन अवतार झाले, असें महाभारतांत वर्णन आहे (मभा. उ. ४८.७-९ व २०-२२ आणि वन. १२१.[खात्रीचेटंकन?]४४-४६. यानींच निष्कामकर्मपर नारायणीय किंवा भागवत धर्म प्रथम प्रवृत्त केला असल्यामुळे सर्व भागवतधर्मीय ग्रंथांत आरंभीं यांसंच नमन केलेलें असते. या श्लोकात व्यासाचें नांव कांहीं ठिकाणीं गाळून त्याबद्दल 'चैद' असा पाठ येत असतो; पण आम्हांस तसे करणे बरोबर वाटत नाहीं. कारण, नररारायण ऋषींनीं भागवतधर्म जरी प्रवृत्त केला आहे, तरी भारत व गीता असे जे या धर्माचे दोन मुख्य ग्रंथ ते ज्यांनीं लिहिले त्या व्यासांसहि आरंभीं नमन करणें आमच्या मतें योग्य आहे. 'जय' हें महाभारताचें प्राचीन नांव आहे ( मभा. आ. ६२.२० ). |