पान:गांव-गाडा.pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११
भरित.

कांहीं गांवांत तनख्यापेक्षा जास्त वसूल येई, तर कांहीं गांवांत सबंध तनखा वसूल होत नसे. ह्यामुळे गांवच्या हिशेबांत कोठें फाजील निघे. तर कोठे बाक्या ओढाव्या लागत. ही अव्यवस्था मोडण्यासाठी मराठेशाहीत दर गांवाहून जास्तसालबेरीज म्हणजे जास्तीत जास्ती जो वसूल आला त्याचा दाखला काढून तोच गांवच्या तनख्याऐवजी कायम केला, आणि त्याला 'कमालआकार' हे नांव दिले. कमालआकारांत कमजास्त करून सालोसाल जो ऐन वसूल करीत, त्याला 'वसुली आकार' म्हणत. कारणपरत्वें मिरासी जमिनी उपऱ्या झाल्या, आणि कौलदारांनी कुल जमिनीचा-मग तिच्यांत पेर होवो कां ती अंशतः किंवा सर्वस्वी पडित राहो-सरकारसारा देण्याच्या कबुलायती करून देऊन हळुहळू उपऱ्या जमिनी मिरासींत चढवून घेतल्या, असे दाखले मिळतात. इ. स. १८१८ सालीं असें दिसून आले की, पुण्यासाताऱ्याच्या आजूबाजूलां जिकडे तिकडे मिरासीच मिरासी जमीन; तेच आडवळणी सुभ्यांत उपरी जमिनीचे क्षेत्र उमाप होते. असो. ह्याप्रमाणे कुणब्यांचे मिरासदार आणि उपरी असे दोन विभाग झाले.

 मिरासदार आणि उपरी हे कुणब्यांचे वर्गीकरण केव्हां झालें असेल तें असो; परंतु मराठेशाहीच्यापूर्वीच तें महाराष्ट्रांत सर्रास प्रचारांत होतें. तुकोबा म्हणतात, 'हे माझे मिरासी। ठाव तुझ्या पायापाशीं ॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥.' मिरासी व मिरासदार ह्यांमध्ये केवढा आत्मभाव प्रदीप्त झाला होता, हे वरील अवतरणावरून दिसून येण्यासारखे आहे. मिरासदारांचा दर्जा फार उंच मानीत. ते ठरलेला धारा देऊन वंशपरंपरेनें जमीन धारण करीत. मिरासीवरील सारा सरकारला वाढवितां येत नसे. परंतु तिच्यांत पेर होवो वा न होवो तिजवरील सरकारदेणे चुकत नसे. सारा येत असे तोपर्यंत सरकाराला मिरासदाराकडून जमीन काढतां येत नसे, आणि यदाकदाचित् त्याकडे सारा थकला तरी देखील मिरासदार तीस वर्षांवर परागंदा झाल्याशिवाय मिरास जमीन अजीबात खालसा करण्याचा सर-