पान:गांव-गाडा.pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
गांव-गाडा.

इतकी ताकद दुसऱ्या कोणत्याही जातींत नसते, म्हणूनही कदाचित् ब्राह्मणाला जसें पंडित, तसे कुणब्याला बळी ( बलवान् ) म्हणण्याचा रिवाज पडला असेल. कुणबीक हा जसा आद्य धंदा आहे, तसा तो प्रधान धंदाही आहे. 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी' अशी म्हण पडण्याचे कारण इतकेच की, आपल्या देशांतला मुख्य धंदा शेतीचा आहे, आणि सर्वं धंदे शेतीवर जीव धरून आहेत. अझूनही शेकडा ७२ लोकांचे पोट शेतीवर चालतें, आणि शेकडा ८० जणांची धांव जमीन संपादन करण्याकडे आहे. लोकांचा असा ठाम विश्वास आहे की, पोटाला भरपूर आणि निरंतर एक काळी आई देईल; पैसा जातो, परंतु जमीन ठिकाणी राहते व तिच्यांतलें धन सालोसाल उकरून खाता येते. तेव्हा असला अक्षय धंदा ज्याला साधला, त्या धंद्याच्या लोकांनी आपल्या आधारावर धंदा करणाराला अडाणी (अडणारा) म्हणं नये तर काय म्हणावें? ज्या धंद्यांचा काळीशी निकट संबध नाहीं ते करणारांना 'पांढरपेशे' म्हणतात, आणि ते ब्राह्मण झाले तरी कुणब्याच्या हिशेबी अडाण्यांतच मोडतात. तरी पण खेड्यांत जातिपरत्वें अडाणी शब्दाची भिन्न भिन्न योजना दृष्टीस पडते. वाण्यांला विचारले, तर ते सांगतील की, वाण्या-ब्राह्मणांची बारा घरें, आणि बाकी अडाण्यांची. गुरव, सुतार, सोनार, हेही वाणी, ब्राह्मण व स्वतःची जात वगळून बाकीच्यांना अडाण्यांत ढकलतील. असे आहे, तरी ज्याअर्थी कुणबिकीने खेडे बहतेक वेढले आहे, त्याअथा कुणबी करतात तेच लोकवस्तीचे विभाग "कुणबी" आणि "अडाणी" हे अधिक ग्राह्य, आणि खेड्याची उत्पत्ति व सर्वसामान्य स्थिति प्रतिबिंबित करणारे आहेत, ह्यांत संशय नाही.

 खेड्यांत अव्वल आणि प्रधान वस्ती कुणब्यांची. तेथें अडाण्यांच्या साऱ्या द्वारकेची एक काय ती मेढ, आणि ती कुणबी होय. "धान्यानामष्टमो भागः षष्ठो द्वादश एव वा आददीत" इत्यादि मनुस्मृति आहे, तरी राजाने रयतेच्या उत्पन्नाचा सहावा हिस्सा भागधेय ( कर ) म्हणून घ्यावा, असा सरसकट धारा पडला असावा. म्हणूनच संस्कृतात