किंवा गांवढेकऱ्यांचा उधारीचा व्यवहार फायद्याचा असेल तर गोष्ट वेगळी; पण तो तसा नसेल तर तो जितके लवकर बंद होईल आणि तो बंद करण्याच्या कामांत ज्या येतील त्या अडचणी जितक्या लवकर दूर करूं तितकें बरें. वाण्यांना किंवा बलुतदारांना नांवे ठेवून कुणब्याची स्थिति सुधारते असे नाही. त्याची स्थिति सुधारण्यासारखी परिस्थिति निर्माण केली पाहिजे. वतनपद्धति अल्प खर्चाची नाही, आणि असेल तर जो तो या वैश्ययुगांत आपल्या कसबाप्रमाणे पैसे चोपून घेत असतांना वतनदारांना तरी कमी वेतनावर काम करण्यास कां भाग पाडावें ? पूर्वीप्रमाणे ह्या राज्यांत वतनदार गांवाला अगर वतनाला जखडलेले नाहीत.त्यांना पोटापाण्यासाठी वाटेल तेथे जाण्याची मुभा आहे. अर्थात् त्यांना गांवीं डांभण्याचा कोणालाही हक्क नाही. पूर्वीच्या काळी वतनपद्धतीचा कितीही उपयोग झाला असला तरी ह्या काळांत ती चालविणे कोणालाही हितकर नाही. एकाद्या श्रीमंत जहागिरदाराने आपल्या भोंवतीं मोठा थोरला परिवार जमवावा आणि पुढें संपत्ति नाहींशी झाल्यावर व परिवारापैकी पुष्कळांचे काम नाहींसें झाल्यावरही तो तसाच ठेवावा हे जसें भोपळसुती आहे, तितकेंच प्रस्तुत काळी सर्व कारू-नारू गांवगाड्याने ह्मणजे कुणब्याने पोसणे आहे.
पान:गांव-गाडा.pdf/248
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत. २२७