Jump to content

पान:गंगाजल (Gangajal).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | १४१ व्यक्त होत होते. महायुद्धोत्तर काळात मराठी लघुनिबंध फार मोठ्या जोमाने विकसित झाला असे म्हणता येणार नाही, तरी सुद्धा ललितनिबंधातील खरी कलात्मकता आणि खरे लालित्य याचनंतरच्या काळात अभिव्यक्त झाले. विदा करंदीकर, श्रीनिवास कुलकर्णी, पाडगावकर आणि या सर्वांना काकणभर सरस असणारा अनेकपदी, गुंतागुंतीच्या, सूक्ष्म, भावगर्भ व विचारगर्भ अनुभवांना शब्दबद्ध करणाऱ्या दुर्गा भागवत यांचा ललितनिबंध या कालखंडातील आहे. ज्याला खऱ्या अर्थाने एखाद्या वाङ्मयप्रकाराचा विकास म्हणता येईल, तो या लेखकांच्या ललितनिबंधामध्ये जाणवतो. इरावतीबाईंच्या ललितनिबंधाकडे या नव्या आणि खऱ्याखुऱ्या ललितनिबंधाचा अग्रदूत म्हणून पाहिले पाहिजे.. इरावतींचे मन त्यांच्या विशिष्ट जीवनक्रमामुळे तीन पातळ्यांवर वावरणारे मन होते. आपण संसार मांडलेल्या गृहिणी आहो, पत्नी या पान व माता या नात्याने आपणांवर पडणाऱ्या जबाबदाऱ्या आपण पार उल्या पाहिजेत, ही गृहिणीची भूमिका त्यांच्या मनातून काही बाजूला कला नाही. त्या एक कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या, असे म्हणणे त्यांच्यावर जस अन्यायकारक होईल. कारण संसार त्यांनी कर्तव्य म्हणून पतकरिलेला , गृहिणीची भूमिका कर्तव्य म्हणून पार पडलेली नव्हती. मनाने कत असणाऱ्या आणि जीवनात रस घेणाऱ्या या विदुषीला आपण स्त्री स, गृहिणी आहोत. याची उपजत जाणीव होती. मातृत्वात आपल्या लाचा परिपूर्ती आहे, याचीही उपजत जाणीव होती. म्हणून त्या घरात, आपल्या प्रिय पतीत, मुलाबाळांत मनाने समरस झालेल्या आणि या आहेत. तो जण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक उपजत धर्म आहे. कतव्याच्या भावनेपेक्षा अंगभूत आपलेपणाची भावना अधिक वाचा आहे. या गहिणीपदातून निर्माण झालल मन एक कायमचा भाग आहे. कोणत्याही प्रश्नाचा विचार करिताना क सांसारिक स्त्री आहो, या जाणिवेचा विसर त्यांना कधी होत रमलेल्या आहेत. तो ज मनाचा एक कायमचा में नाही. पण ही सांसारिक स्त्रा 'भारताच्या बाहेरही पण ही सांसारिक स्त्री दुसऱ्या बाजूने समाजशास्त्रज्ञ आहे. शास्त्राच्या अध्ययनात एकतर त्यांना संपूर्ण भारतभर हिंडावे लागले. ।। बाहेरही व्याख्यानांच्या निमित्ताने, अभ्यासाच्या निमित्ताने जीवनात त्यांना वावरावे लागले आणि दुसरे म्हणजे विविध जाती.