पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गोष्ट मोफत घ्यायची नाही नि द्यायची नाही, असा कटाक्ष पाळला. गरिबातील गरीब शेतकरी त्यांच्या प्रयोग परिवारात फी भरून सहभागी होत असे.
 सरांच्या या कार्याला डेन्मार्क, जर्मन, मेक्सिको अशी अनेकदेशी मान्यता मिळाली. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिसंवादात भाग घेतला. बीजभाषणं केली. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना जमनालाल बजाज पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आलं. अरुण शौरींसारख्या शोधक पत्रकारानं त्यांच्या प्रयोगाची दखल घेऊन लेखन केलं. विजय तेंडुलकरांनी ‘दिंडी' कार्यक्रमांतर्गत त्यांचा प्रयोग प्रक्षेपित, प्रसारित केला. मराठी विज्ञान परिषदेनं त्यांना गौरविलं. हे सारं जरी खरं असलं, तरी त्यांनी प्रयोग परिवारामार्फत रुजवलेली शिक्षणपद्धती, विज्ञानाच्या सरलीकरणाची चळवळ, तंत्रज्ञान लोकभाषेत प्रसारित करण्याचा प्रयत्न या सा-यांची नोंद घेऊन आपलं शिक्षण पुनर्रचित करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सर्व कृषी विद्यापीठांनी त्यांच्या प्रयोगाचं तंत्र सार्वत्रिक करणं यातूनच त्यांना अपेक्षित असलेला प्रयोगधन समाज साकार होईल.

 प्रा. श्री. अ. दाभोळकर यांनी शिक्षण संस्थांच्या लोकशाही करणाचा केलेला प्रयागे आजच्या शिक्षणाच्या खासगीकरणाच्या युगात अधिक महत्त्वाचा आहे. गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठाचं झालेलं लोकशाहीकरण म्हणजे प्रा. दाभोळकरांच्या द्रष्टेपणाचं फलित होय. मौनी विद्यापीठात सन १९७५ च्या दरम्यान अशांतता निर्माण झाली. तिथलं शिक्षण धोक्यात आलं.प्रा. दाभोळकरांनी शिक्षक व कर्मचा-यांचे संघटन करून,आंदोलन, संघर्ष इ.द्वारे ती संस्था लोकशाही घटना पद्धतीची केली. त्यामुळे शिक्षणात संबंधित घटकानच्या मताला कायदेशीर रूप आलं. तो प्रयोगेनंतर महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्थांत अंमलात आला. आज कायद्याने शिक्षक व कर्मचारी शिक्षण संस्थेच्या संचालनाचे अगं बनले. हे योगदान प्रा. दाभोळकरांचे, त्याचे विस्मरण करून चालणार नाही.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१३२