पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोन शब्द...
 मी महात्मा गांधींच्या विचारानं, बाबासाहेबांची राज्यघटना हाती घेऊन परिवर्तनाच्या वाटेवर प्रवास करणारी एक कार्यकर्ती आहे. हा रस्ता का निवडलाय? आपण का चालतोय? है लिहून, भूमिका मांडून यापूर्वी नाही संगितलं. वयाच्या पन्नाशीत मी तुकड्यातुकड्यानं काम करत कौलाज जोडण्याचा प्रयत्न करते आहे. ते सांगावं, अनुभव शेअर करावा, असं वाटतंय. म्हणून बीड जिल्ह्यातल्या कामाचा अनुभव या पुस्तकाच्या माध्यमातून मांडत आहे. कोणत्याही राजकीय मांडणीचा हा विषय नाही. काय झालं पाहिजे, व्यवस्था बदलासाठी काय शक्य आहै, यासंदर्भात अनुभवातून समोर आलेल्या बाबींचा हा धांडोळा आहे. या प्रक्रियेत आलेल्या अडचणींसह ही प्रक्रिया कशी झाली, है सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
 मला माणूस म्हणून अशीही कुठे पोहोचण्याची घाई कधी नसतेच. प्रवास, संघर्ष आणि त्यादरम्यान अडचणींवर मात करण्यासाठी करण्याचं तातडीचे नियोजन ही कामातली मजा अनुभवणारी मी कार्यकर्ती आहे. हैपुस्तक म्हणजे काम करताना आलेल्या अनुभवांबद्दलचं एका कार्यकर्तीचं मुक्तचिंतन आहे. जे जसं जाणवलं, तसंच वाचकांसमोर ठेवलं आहे. वाचून वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढील प्रवासासाठी, संघर्षासाठी उपयुक्त ठरतील. या प्रवासातले सहुप्रवासी अॅड. शैला जाधव, कैलास जाधव, माझी धाकटी बहीण रूपा मुळे यांच्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. संजीव (पति) आणि मनू (मुलगी अॅड. चैत्रा व्ही.एस.) शिवाय मी एकही पाऊल पुढे टाकू शकत नाही. या प्रवासाचा अनुभव पुस्तकरूपानं आणण्याची कल्पना सत्यात उतरविण्यात मदत करणारे राजीव मुळ्यै हैही या प्रक्रियेचे साक्षीदार आहेत.
 अनेक वेळा कार्यकर्ता म्हणून आपल्याला एखादी समस्या दिसते आणि ती सोडवण्यासाठी आपण रिंगणात उतरतो. प्रवोधन आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरून त्या समस्येतून मार्ग काढायचा प्रयत्न करतो. रचनात्मक कामाची जोड देतो. परंतु समस्येच्या मुळाचा विचार करताना आपल्याला आणखी अनेक समस्या दिसू लागतात. त्या सुट्या-सुट्या कधीच नसतात. एकमेकांत गुंतलेल्या असतात. सगळ्यांचं मूळ स्थानिक परिस्थितीशी, लोकांच्या जीवनशैलीशी निगडीत असतं. केवळ एका समस्येची सोडवणूक करून कायमस्वरूपी असं काहीच हाती लागणार नाही, हे काम सुरू केल्यावर उलगडत जातं. कामाचा केंद्रबिंदू बदलत राहतो. आपलं आकलन वाढत जातं. कार्यकर्ता म्हणून आपलं प्रशिक्षण होत राहतं. बीड जिल्ह्यातल्या माझ्या अनुभवात हेच घडलं. म्हणजेच, कार्यकर्ता म्हणून माझ्या शिक्षणाचा प्रवासही या अनुभवकथनात आहे.