पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना
-------

 “ज्ञान प्रबोधिनी" "संस्था १९६२ पासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण, ग्रामविकस, संशोधन आणि संघटन ही प्रमुख उदिष्टे समारे ठेवून अनेक प्रकल्प सुरु आहेत. व्यक्तिविकास व कार्यविकास याबरोबर समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्वविकसन होण्यासाठी वैशिष्ठयपूर्ण कार्यपध्दतीची या सर्व प्रयोगांना जोड दिली जात आहे.

 ज्ञान प्रबोधिनी संस्थेमार्फत ग्रामीण उद्योजकतेच्या संदर्भात १९६५ ते २००० या कालावधीत काय उपक्रम राबविले, त्याचं उद्दीष्ट काय, त्यामागची भूमिका कोणती होती, या कामामुळे काय साध्य झालं, या साऱ्याचा आढावा घ्यायचं ठरलं. यासाठी ज्यांच्याबरोबर काम केलं, ज्यांच्यासाठी काम केलं, ज्यांनी काम केलं अशा अनेकांच्या भेटी घेतल्या. या उपक्रमात सहभागी असणाऱ्यांनी यासाठी वेळही दिला नि माहितीही दिली. सर्वांच्याच मुलाखती जागेअभावी सविस्तर देता आल्या नाहीत. तरीही सर्वांचे मुद्दे येतील असा प्रयत्न केला आहे. या साऱ्या मुलाखती घेण्याचं , त्याचं संकलन करण्याचं आणि त्यांना शब्दरूप देण्याचं काम सुनीला गोंधळेकर ह्यांनी केले.

 बीजारोपण -

 आर्थिक स्वावलंबन ही प्रत्येकाचीच प्राथमिक आवश्यकता आहे. खेडेगावातून या संधी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. तिथल्या हुशार, उत्साही तरुणांना बेकारीचा प्रश्न जास्तच तीव्रतेनं भेडसावतो. शहरी भागातल्या तरुणांना शिक्षण तर ग्रामीण भागामध्ये उद्योजकतेचं प्रशिक्षण अशी दुहेरी भूमिका मग संस्थेनं निवडली. १९६५ पासून या प्रकारच्या कामाला सुरुवात झाली. संस्थेचे संस्थापक व आद्य संचालक वाचस्पती आप्पा पेंडसे यांची दूरदृष्टी आणि सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्याची क्षमता यातून हे काम उभे राहिले.

 प्रबोधिनीचे प्रथम अध्यक्ष श्री. कोटिभास्कर यांनी या कामात पुढाकार घेतला. ते स्वत: मुंबईतले एक उद्योगपती होते. उद्योगधंद्याना चालना मिळण्याची निकड त्यांना जास्तच जाणवत होती. त्यांनी स्वत: प्रबोधिनीत ही कल्पना विकसित केली. त्यासाठी देणगीही दिली. त्याशिवाय १९६८ साली सुपरिचित उद्योगपती मा. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या सहकार्याने ही संकल्पना जोम धरू लागली. शंतनुरावांशी असा व्यावसायिक प्रकल्प कसा उभा करता येईल याविषयी चर्चा झाली. मग त्यांनी त्यांच्या कारखान्यात प्रशिक्षण दिलं, आर्थिक मदत केली आणि उत्पादन केंद्र १९६९ मध्ये पुण्यात चालू झालं.

 १९७१ मध्ये हे उत्पादन केंद्र शिवापूर ह्या पुण्याजवळील सातारा रस्त्यावरील शिवापूर

उद्योग हाच मित्र, उद्योग हाच मंत्र, येईल जरी अपयश, उद्योगच संजीवन     १२