पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कुटुंबाचे उद्योग अधिक यशस्वी -

 अनेक ठिकाणी सुधारत्या आर्थिक घडीबरोबर कुटुंबात एकीची भावना अधिक प्रबळ झाली, घरचे सगळे उद्योगाला मदत करू लागले असंही चित्र आपल्याला दिसतं. बांबूची शुभेच्छा पत्र बनवणं, मुलांचा शालेय प्रकल्प बनविणे हा वेल्ह्यातील मुलांचा नित्याचा उद्योग बनला. मांगदरीच्या वैशालीताई किंवा रंजनाताई ह्यांच्याकडे रेशनचं दुकान नवरा-बायको दोघं मिळून चालवतात. जनाताई खवले आणि त्यांचे पती दोघेही शिवणाचं काम एकत्र करतात.

 ज्या ठिकाणी कुटुंब मिळून एकत्रितपणे उद्योग करतात ते उद्योग यशस्वी आहेत असं दिसून येतं. काहींची मुलं आता शिकत आहेत आणि हिशोबाला मदत करतात. तर काहींचे निवृत्त वडील मुलाला शेतीबरोबर व्यवसाय करायला उत्तेजन देतात. कुरंगवाडीच्या विजयकुमार शिळीमकरांचे शेळीपालन वडिलांच्या आणि घराच्या पाठिंब्यामुळेच अजून उभे आहे. ससेवाडीचे दिनकर वाडकर आणि त्यांच्या पत्नी सावित्राबाई यांच्या एकदिलानी होणाऱ्या कामानी एकाचवेळी ४-५ उद्योगही सुरळीतपणे चालू रहातात.

 काही अनुभव अपयशाचे -

 यातले काही अनुभव हे पूर्ण यशस्वी न झालेल्या उद्योगांचेही आहेत. अर्थात त्यामागे तशी कारणंही आहेतच. वेळूच्या संजय घाटे यांचं वर्कशॉप चांगल्यापैकी ४ वर्ष चालू होतं पण मंदीची लाट आणि काही घरगुती कारणं यामुळे ते बंद करावं लागलं. तर कुसगावच्या चौधरींनी दुधाचा धंदा सुरू केला पण त्यात तोटा झाला. कुरुंगवाडी इथल्या शिळीमकरांनी शेळीपालनाचा नवीन व्यवसाय मोठ्या उमेदीनं चालू केला पण काही कारणांनी ४५ करडं मरण पावली आणि पुन्हा धंदा उभा राहायला खूप अडचणी आल्या. अर्थात त्यांची उमेद संपली नाही. अशी काही अपयशाचीही उदाहरणं यात आहेतच.

 काहींना तोटा होण्यासारखं अपयश आलं नाही पण पुरेसा फायदा होवू शकत नाही. त्यातून व्यवसाय कमी होतो किंवा पुढे कसा चालू ठेवायचा हा प्रश्न पडतो. तर आंबवणे इथला रहिवासी सोनके यांनी १०वी नंतर स्वत:ची वाट शोधत सायकल दुरुस्ती, पेप्सीकोला विक्री आणि नंतर आईसक्रीमची हातगाडी चालवण्याचा यशस्वी उद्योग केल्यानंतरही, नोकरी मिळताच त्याला तीच बरी वाटली. अशाही घटना यामध्ये आहेत.

 या उदाहरणांमध्ये काही परिस्थितीजन्य तर काही वैयक्तिक कारणंही असतील. पण त्याबरोबरच

अयशस्वी माणूस पराभवाच्या ठिकाणी थांबतो. यशस्वी माणूस त्यापुढे जातो.    40