पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 काढावा लागतो. हे काम कल्पनाताईंना पूर्वीपासून येत होतेच. त्याचाच उपयोग करून घेऊन त्यापासून पुढचा म्हणजेच केरसुण्या तयार करण्याचा उद्योग त्यांनी चालू केला. केरसुणी तयार करण्याच्या प्रक्रियेला ४-५ दिवस लागतात. हे कष्टाचं काम हे दोघे गेली ३ ते ४ वर्ष करत आहेत.

 विक्रीसाठी स्वत: बाजारपेठेकडे -

 आपण तयार केलेला माल विकण्याची जबाबदारीही त्यांनी स्वत:च उचलली आहे. एस्. टी. तून डोक्यावर भारे वहात हे दोघे गोगलवाडी, नसरापूर अशा आसपासच्या गावांतून बाजाराला जातात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी सगळ्यात जास्त आणि चांगल्या भावानी विक्री होते. अशावेळी ते पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी विक्रीसाठी जातात.

 मुलाला शिकवायचं -

 हे काम करून उरलेल्या वेळात कल्पनाताई आणि बाबू बुचडे बिगारीचही काम करतात. ही सगळी धडपड आहे आपल्या मुलाला शिकवून मोठं करण्यासाठी. त्याला असा कमी मानाचा धंदा करायला लागू नये म्हणून. पण शाळेत शिकणारा त्यांचा मुलगा त्यांना या उद्योगात मदत करतो. हिशोब तोच ठेवतो म्हणजे जणू घरातच उद्योगाचं प्रशिक्षण आणि अनुभव.

***

 योग्यव्यवसायाची निवड   ११

 नाव - सौ. शालन दत्तात्रय तळेकर

 राहाणार - आंबवणे, ता. वेल्हे, जि. पुणे.

 वय - ३५

 शिक्षण - ७वी पास

 व्यवसाय - भाजीपाला दुकान, शिवण मशीन

 आंबवणे गावात अगदी हमरस्त्यावर शालनताईंचं छोटसं घर आहे. या वर्दळीच्या रस्त्यावर शालनताईंनी घराच्या समोरच आपल्या उद्योगाला सुरुवात केली.

आशावाद ही सर्वात मोठी प्रेरणा आहे.    ३०