पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


भारताची फाळणी, स्थलांतरिताचा ताफा : १९४७
 


तसा पराभव होणे, हे दोन्ही समाजांच्या भावी निरोगी संबंधांच्या दृष्टीने योग्य ठरले असते. आणि म्हणून मुसलमानांच्या तथाकथित आक्रमणाला प्रतिप्रहार करण्याची व उलटी प्रक्रिया सुरू करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या हिंदूंची आणि ती प्रक्रिया पुढे चालविण्याची जणू ऐतिहासिक कामगिरीच आपल्यावर नियतीने सोपविली आहे असे मानणाऱ्या मुसलमानांची मानसिक प्रवृत्ती, हे या संघर्षाचे एक कारण आहे.

 येथे हे स्पष्ट केले पाहिजे की, या इतिहासाची खंत बाळगणाऱ्या हिंदूंची संख्या त्या इतिहासाचा वारसा चालविण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या मुसलमानांहून फारच कमी होती. याचे कारण दोन्ही धर्मांच्या मानसिक प्रवृत्तींत आपल्याला शोधावे लागेल. मोक्षाच्या कल्पनेने भारावलेल्या हिंदूमनाने चुकीच्या बंधनांच्या शृंखला स्वीकारल्या, त्याचबरोबर अशी खंत बाळगण्यापासून ते

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ३३