पान:ओळख (Olakh).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खपण्याजोगे असतात. अगदी स्थल बद्धीच्या माणसालासुद्धा प्रथमदर्शनीच है दोष दिसतात. त्यांची लांब व रुंद यादी करता येते पण असे दिसते की इतके उघड दोष असणारा लेखक पिढयानपिढया टिकन असतो. प्रत्येक पिढीत त्याचा नवा वाचकवर्ग निर्माण झालेला दिसतो. उघडच आहे की लेखक आणि त्याचे लिखाण दोषामुळे टिकत नाही. दोषांवर मात करणारे. ह्या दोषांची उपेक्षा करण्यास भाग पाडणारे काही गण ह्या लेखकांजवळ असतात. हे गुण चटकन जाणवण्याजोगे नसतात पण त्यांचा वाचकांवर प्रभाव व परिणाम दिसत असतो. प्राचीन मराठी वाङमयात मोरोपंत हे 'असे कवी आहेत की प्रत्यक्ष केशवसुतांनाच त्यांचे अनकरण करण्याची इच्छा झाली होती. केशवसुताचे मत असे की गेल्या शंभर वर्षात मोरोपंतांच्या एवढा मोठा कवी झालेला नाही. आधनिक मराठी वाङमयात गडकरी हे असे नाटककार आहेत. नवकथच्या प्रवत काला-गंगाधर गाडगीळांना-गडकरी हा मराठी साहित्याचा मानदंड आहे, असे म्हणावेसे वाटले. भोरोपंत कवीच नाहीत असे म्हणणान्या पिढया उलटल्या. हे सांगनही आता १०० वर्षे झाली, अजन मोरोपंत कवी म्हणून उभा आहे. खांडेकरांचीही जात तीच आहे. गेली पंचेचाळीस वर्षे हा कृत्रिम लेखक आहे हे सांगण्यात गेली. आणि आता इतक्या वर्षांनंतर पाहावे तो हा कादंबरीकार ज्ञानपीठाचा मानकरी झालेला. अशा लेखकांची सामर्थ्य स्थाने शोधणे हे समीक्षकांचे खरे काम असते. या लेखकांजवळ असे काय आहे की ज्यामुळे त्यांचे दोष क्षम्य ठरले ? या प्रश्नाचे ममर्पक उत्तर देण्यात समीक्षेची गणग्राहक मामिकता असते.

 आज या क्षणी खांडेकरांच्या वाङमयावर प्रेम करणान्या सर्व वाचकांच्या मनात आनंदाचा उल्हास जागा झालेला असणार. एखादे वाङमयीन विवेचन करण्याचा हा क्षण नाही. ती माझीहो इन्छा नाही पण जाता जाता दोन बाबी सांगितल्या पाहिजेतच. प्रथम म्हणजे ही की ययातीमुळे मराठीत पौराणिक कादंवरीची एक नवी परंपरा अस्तित्वात आलेली आहे. शिवाजी सावंतांची 'मत्यंजय ' आणि रणजित देस ईंच राधेय ' ह्या दोनच कादंबऱ्या मला अभिप्रेत नाहीत. माडखोलकर त्यांची जन्म दुदवी' व 'रेणका', आनंद साधल्यांची । वैदेही' व · अंजनीचा सूत', परांजपे ह्यांची 'युगावेगळा ' अशा अनेक कादंबन्या माझ्यासमोर आहेत. शिरवाडकरांसारख्या ज्येष्ठ कवी-नाटककाराससुद्धा ययातीचे जीवन नाटकासाठी घ्यावेसे वाटले. ययातीने एक परंपरा व प्रवाह निर्माण केला आहे. वाङमयात परंपरा व प्रवाह निर्माण करण्याचा योग ज्या लेखकांना येतो त्याचा विचार आपण कोणत्या पद्धतीने करणार आहो असाही एक प्रश्न आहे. ह्याचा विचार व्हायला हवा. दुसरी बाब ही की जीवनात स्वप्नाचे महत्त्व आपण कोणते मानणार आहोत ? स्वप्ने कधी

ओळख