पान:ओळख (Olakh).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शाकुंतल, शारदा, संशय कल्लोळ यांची नोंद आपण विसरत नाही पण ' राणाभीमदेव', 'संत तुकाराम', 'राक्षसी महत्त्वाकांक्षा', 'सन्यस्तखड्ग' व 'आग्याहन सुटका' या नाटकांच्या नोंदी आपण सहज विसरून जातो. कोणत्या नाटकाचे प्रयोग त्या त्या काळी गाजले आणि कोणती नाटके खाडिलकरांच्या विरोधी उभी होती हे कळण्यासाठी हे परिशिष्ट महत्त्वाचे आहे. ह्यात परिश्रमपूर्वक केलेल्या परिशिष्टांचा काळजीपूर्वक अभ्यास मराठी नाट्यसृष्टीच्या आकलनाला अतिशय उपयोगी ठरेल असे माझे वैयक्तिक मत आहे.

 वा. लं. नी केलेल्या विवेचनामळे खाडिलकरांच्या नाटकावर संपूर्णपणे नवा प्रकाश पडलेला दिसून येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'संगीत मानापमानचे' त्यांचे रसग्रहण हे आहे. या नाटकाने मराठी टीकाकारांना सदैव घोटाळयात टाकलेले होते. कोणी प्रामाणिकपणे हा घोटाळा कबल करीत पण बहुतेकांना हा घोटाळा जाणवत नसे. कारण या नाटकात अत्यंत भित्रा आणि मूर्ख लक्ष्मीधर श्रीमंतांचा प्रतिनिधी आहे, गरीब विरोधी श्रीमंत या झगडयात सधन वर्गाचा धूर्तपणा, वेडरपणा आणि धाडसीपणा लक्षात घेतला जातो. लक्ष्मीधर हे पात्र श्रीमंताचे प्रतिनिधी होऊ शकेल काय ? हा छळणारा पहिला प्रश्न. या नाटकातील अत्यंत शूर, पराक्रमी व देखणा धैर्यधर तितकाच तारुण्यसुलभ शंगारवेधी आहे. तो झटकन स्त्रियांकडे आकर्षित होतो. तो सेनापती आहे, जगातील गरिवांचा हा धैर्यधर प्रतिनिधी आहे काय? हा दुसरा प्रश्न लक्ष्मीधर सारखा भ्याड माणूस रणांगणावर पाठवला तरी कशाला होता आणि ऐन सरहद्दीवर भामिनी राहत कशी होती हा छळणारा तिसरा प्रश्न. या नाटकात एका क्षणी धन नसेल तर इतर सर्व गुण विफल आहेत असे म्हणून धैर्यधराचा अपमान करणारी भामिनी दुसन्या क्षणी धैर्यधरावर भाळते आणि धनराशीचा तिटकारा करू लागते हे हृदय परिवर्तन कितीसे स्वाभाविक आहे हा छळणारा चौथा प्रश्न. या चार प्रश्नांत सारेजण गढलेले होते. इतके अस्वभाविक ठिसळ कथानक असणारे हे नाटक, मग याचा प्रयोग इतका रंगदार होतो कसा? याचे समाधानकारक उत्तर टीकाकारांना कधीच देता आले नाही. या सर्व प्रश्नांमध्ये अजून एक प्रश्न विचारून वा.लं.नी भरच घातली आहे. तो प्रश्न म्हणजे भामिनी धैर्यधराशी लग्न करते त्यावेळी धैर्यधर गरीव राहिलेला नसतोच. त्याला २५ लाखाची जहागीर व तीन चांदाची सरदारकी मिळालेली असते. शेवटी लक्षाधीश भामिनीचे लग्न लक्षाधीश धैर्यधराशीच होते. यात धन सोडून पराक्रमी व गणवान निर्धन पुरुषाकडे आकर्षित होण्याचा प्रसंग भामिनीवर ख-या अर्थाने येतोच कुठे? खरे म्हणजे एका गंभीर नाटकाकडे ज्या पद्धतीने पाहावे त्या पद्धतीने मानापमान ' कडे पाहणे हीच मळ चक होती. 'मानापमान' हा

ओळख

११९