येतील, याचा विचार व्हायला हवा. परिसरातील गरीब विध्यार्थ्यांना साहाय्य, सामाजिक संस्थांना मदत, परिसरातील गुणीजणांचा गौरव अशा नेहमीच्या कार्यक्रमांना फाटा देऊन नव्या पद्धतीने याचे नियोजन शक्य आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या उत्सवी गडबडीत गंभीर, दिशादर्शक उपक्रम शक्य असत नाहीत. अशावेळी परिसरातील श्रेष्ठ कलाकरांचे कलाविष्कार घडवता येणे सहज शक्य आहे. गायन, गाणी, लोककला उत्सव, चित्र प्रदर्शन, छायचित्र प्रदर्शन असे उपक्रम शक्य आहेत. पूर्वी हे होत होते. दहा दिवसांचा उत्सव व पाऊस ओसरल्यानंतर या मंडळांना व्याख्यानमाला, चर्चासत्रे, नाटक, प्रदर्शन, कलाविष्कार असे उपक्रम स्वास्थ्याने व नियोजनपूर्वक करणे शक्य आहे. आज मंडळांचे सदस्य, पदाधिकारी सुशिक्षित, पदवीधर आहेत. त्यांनी उत्सवाचं सामाजिक भान सोडून चालणार नाही.
गणेशोत्सव मंडळांना अनेक संस्था पुरस्कार देतात. शांततापूर्ण मिरवणूक, उत्कृष्ट सजावट याबरोबर समाजहिताचे कार्य करणाच्या मंडळांचा अग्रक्रमाने विचार होणे गरजेचे आहे. केवळ दहा दिवसातील गोंधळ, गडबडीतील कार्यक्रमापेक्षा मंडळाने गेले वर्षभर निधीतून काय सामाजिक उपक्रम राबवले याचा विचार करून मंडळांना पुरस्कार देण्याचे धोरण पुरस्कार देणाच्या संस्था, संघटना, यंत्रणांनी (विशेषतः पोलीस) अवलंबायला हवे. गणेशोत्सवाच्या स्वागत व विसर्जन मिरवणुकीत शील, शिस्त व शिवत्व (पावित्र्य) यावर भर द्यायला हवा. त्यातून राष्ट्रैक्य, सामाजिक सद्भाव, समाजप्रबोधन, सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन, राजकीय विसंगतीवर टीकास्त्र सोडण्याचे भानच अशा मिरवणुकांचे महत्त्व वाढवतील. लग्नाची वरात व गणेशोत्सव मिरवणूक यातील अंतर लक्षात घेऊन आखणी व्हायला हवी. भपक्यापेक्षा भिडण्यावर बळ हवे. हजारो लोक वेळ, वाहने, पैसा खर्च करून येतात. त्यांना दृष्टी देण्याचे काम देखावे, मिरवणुका, उत्सवातील विविध कार्यक्रमांतून साधायला हवे. या काळात सार्वजनिक पैशाचा जितक्या मोठ्या प्रमाणात अनाठायी खर्च, अपव्यय होतो तितक्याच मोठ्या प्रमाणात पोलिस व शासन यंत्रणेचे (म्हणजेच जनतेचे) पैसे खर्च होत असतात. बंदोबस्त म्हणजे गर्दीचे नियंत्रण नव्हे, तर असामाजिक वातावरणाचे नियमनही असते हे अजून आपण लक्षात घेत नाही. उत्सवाच्या गर्दीत केवळ चार पाकीटमार, सडकसख्याहरींना जेरबंद न करता दक्षता समितीने सामाजिक उपक्रम वाढीस प्रोत्साहन देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकरांनी खरी गणेश प्रतिष्ठापणा दीड दिवसाचीच शास्त्रात मान्य आहे असे म्हटल्याचे कालच मी एका वृत्तपत्रात