अडकायचं आहे की ‘सब भूमी गोपाल की', 'हिंदी चिनी भाई-भाई’, ‘ना कोई हिंदू, ना कोई मुस्लीम', मळ्यास कुंपण नसलेलं शेत करणारा शेतकरी, निःशस्र पोलीस-सैनिक, सख्खेशेजारी असं या क्षणी विश्वास न बसणारं पण निर्माण होऊ शकणारं जग?.... वैश्विक करुणालय' आपणाला हवंय...मानवी हक्कांची अभयस्थळे' आपण निर्माण करणार आहेत की नाही, हा खरा प्रश्न आहे.
एक गोष्ट मला स्पष्ट करायला हवी की झालेल्या घटना, अपराध नि अपराध्यांचा मी समर्थक नाही. हत्या ही निषेधार्हच; पण हत्या हत्येने थांबत नाही याकडे मला लक्ष वेधायचंय!
महाराष्ट्राचा थरकाप उडविणा-या बालक हत्याकांडातील दोषसिद्ध आरोपींना अटक झाल्यापासून ते शिक्षा होईपर्यंतच्या विविध घटनांचा मी मूक साक्षीदार आहे. समाजाने या हत्याकांडाची वृत्तपत्रांत छापून आलेली वृत्तं वाचूनच आपलं क्रूर मन क्रुद्ध केलंय... पडद्यामागची संवेदनशील यंत्रणा त्यांनी अनुभवली असती तर जनतेच्या मनात करुणेचा ओलावा, पाझर, थेंब झरला असता....
१९९६ चा उत्तरार्ध. २२ ऑक्टोबर १९९६ ला नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यातील फौजदार पी. ए. सैदाने यांना क्रांतीच्या तपासातील रेणुका व सीमा यांना आपण पूर्वी पुण्यात अटक केल्याचं आठवलं... नेहमी निसटून जाणाच्या सीमा, रेणुका नि नंतर अंजनाबाई गावित नि किरण शिंदेही पोलिसांच्या जाळ्यात सापडले. एव्हाना ३ नोव्हेंबर उजाडलेला. तपासात गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात येत गेलं. शासनाने ५ नोव्हेंबरला या तपासाचं काम राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केलं. उपअधीक्षक एस. एस. माने, निरीक्षक एस. एच. बोधे, सुहास नाडगौडा, पी. एस. हिरे, हजारे, आर. एन. गामणे, प्रदीप घोडे, व्ही. आर. गवळी तपास अधिकारी म्हणून मुक्रर झाले. तपास अधिका-यांपुढे दोन आव्हाने होती-गुन्ह्याचा तपास नि मुलांचा शोध... पळवलेली मुलं यांनी काय केली? सोडली, मारली, हरवली, टाकली... इतक्या मुलांचे यांनी काय केलं?
त्या वेळी मी महाराष्ट्रातील सर्व अनाथाश्रम, रिमांड होमचे संचालन करणाच्या मध्यवर्ती राज्य संस्थेचा अध्यक्ष होतो. निरीक्षक सुहास नाडगौडा आपल्या एका साथीदार अधिकाच्यासह कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात आले. त्यांना महाराष्ट्रातील साच्या संस्थांची माहिती, यादी हवी होती नि या संस्थांत पळवून नेलेली मुलं आहेत का ते पाहायचं होतं... पोलीस यंत्रणा नुसते अपराध शोधत नव्हती, माणूसही शोधायची हे जेव्हा मी जवळून पाहिलं