पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शकलो, येथील समाजमन सर्जनशील होऊ शकले तर आर्किमिडीजच्या आत्मविश्वासाने आपण जगात घट्ट पाय रोवून पृथ्वी उलटवून दाखवू शकू!
 अश्मयुग वा तत्पूर्वी मनुष्य भ्रमणशील होता. या अवस्थेत कृती, कार्य ही त्याच्या जीवनाची अट होती. तो सक्रिय राहिला नाही तर मरण पुढे उभे ठाकलेले असायचे. जो चोच देतो तो चारा देतो' असे आपल्या मनावर बिंबविण्यात आले आहे. पण आपण हे विसरता कामा नये की चारा देणारा चोचीत आणून घालत नाही. तो शोधयला लागतो, त्यासाठी भरारी मारायला लागते. तीच आज आपण हरवून बसलोय. याचे मूळ आपल्या स्थैर्यात आहे. शेतीचा शोध लागला नि आपण स्थितीशील झालो. चाकाने आपल्या जीवनात गती आणली, अंगमेहनतीच्या कामातून आपणास मुक्त केले हे जितके खरे तितके या चाकाने आपणास आळशी केले हेही मान्य करायला हवे. आता माहिती व तंत्रज्ञानाच्या तिस-या क्रांतीने तर कामास कामाचाच पर्याय निर्माण केल्याने भारतीय माणसापुढे आळस पोकळी (Space of Idle) निर्माण केली आहे. सारं जग "Deliv's Worksho' होण्याची साधार शक्यता नाकारता येत नाही. 'I Love you', 'Love Bug' नि आता 'Hurrby-Love Bug Two' सारखे एकापाठोपाठ येणारे 'व्हायरस' हेच नाही का सिद्ध करतात? निष्क्रियतेचं आव्हान माझ्या दृष्टीने अस्तित्वाचीच लढाई होय.
 यंत्र, तंत्र, नि आत मंत्र (Vocal Remote Control) अशा सतत प्रगत होत जाणा-या आपल्या जीवनाने माणसास व्यर्थ, कुचकामी बनवलंय. पूर्वी व्यवस्थापन शास्त्रात दोनच प्रकारचं मनुष्यबळ मानलं जायचं. White Collar Worker व 'Blue Collar Worker' - अंगचोर(?) व अंग मेहनत करणारे. आता 'Steel Coller Worker' आलेत- यंत्रमानव! त्यामुळे जपानमध्ये तेथील श्रम मंत्रालयाला कारखानदार जेव्हा माहिती देतात तेव्हा मनुष्यबळाचा उल्लेख ‘रप थ्रीज्ञशी' असा करतात. कारण तिथे माणसं आता 'रोबोट' मुळे अल्पसंख्य ठरू पाहात आहेत.

 कार्यसंस्कृती (Work Culture) हा विचार आता नवव्यवस्थापन शास्त्राचा मूलभूत विचार ठरतो आहे. ही संस्कृती प्राप्त मनुष्यबळास उत्पादक, निर्मितीक्षम, संवेदनशील, बनवू मागते आहे. जगभर असं मानण्यात येतं की काम करणारे तीन प्रकारचे लोक असतात. १) कर्मठ- कार्यमूल्य जाणणारे. ही मंडळी कामाचे महत्त्व जाणतात. काम करताना आनंदी असतात. कामाची त्यांना आवड असते. स्वतःहन ते कामासाठी पुढे येतात. कर्मठशील माणसं हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच असतात, त्यांच्यात सात रेड्यांचं बळ असतं असं म्हटलं जातं. खरं तर असतं ते आत्मबल. आत्मबल हे अश्वबलात

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/५७