हे पान प्रमाणित केलेले आहे.
देश बनवणं गगनाला गवसणी घालण्यासारखं अशासाठी आपणा सर्वांना वाटतं की त्यासाठी आपली मानसिक तयारी व प्रतिबद्धता नाही.
चीनसारखा देश एखादं वर्ष अपत्यहीन वर्ष म्हणून पाळून आपली लोकसंख्या उताराला लावू शकतो. आपण का नाही हे करू शकत? अशी बेचैनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण व्हायला हवी. ज्या देशातील नागरिकांच्या मनात परिवर्तनाचा भुंगा नेहमी पिंगा घालत असतो, तोच देश बदलत राहतो. या तर, आपण आपला देश बदलू! स्वदेशी प्रजासत्ताक चिरायू होवो!!
■■
एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/५२