पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहणारे आपण भारतीय! आपलं प्रजासत्ताक प्रशासन निर्माण का नाही करू शकलो? मला वाटतं, गेल्या पन्नास वर्षांत आपण अक्षरकेंद्री साक्षरतेच्या वर्तुळात गुरमटत राहिलो. साक्षर प्रजासत्ताक, जागृत प्रजासत्ताक, लोकानुवर्ती प्रजासत्ताक, प्रजाहितदक्ष प्रशासन अशी किती तरी क्षितिजे आपण पार करायची आहेत. सरकारी यंत्रणेस दोष देऊन चालणार नाही! प्रजासत्ताकातील प्रत्येक नागरिकात देशहित दक्षता यायला हवी! नागरिकांचे चरित्र हेच देशाप्रशासनाचे चरित्र असते हे विसरून चालणार नाही. ते निर्माण होईपर्यंत तरी मला मन मागे टाकता येणार नाही.










एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/३१