पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उच्च शिक्षणातील भाषेची नवी क्षितिजे

 आज जो उठतो तो डॉक्टर, इंजीनिअर, स्पर्धा परीक्षा इ. मळलेल्या वाटेवर चालत राहतो. प्रत्येक शिकणा-याचे स्वप्न असते. भरपूर शिकायचे, मोठे व्हायचे. गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवायची, मोठा हुद्दा मिळवायचा, लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचे, सत्ता व अधिकार उपभोगायचा, रेड कार्पेट सन्मान मिळवायचा, भरपूर पैसा, संपत्ती कमवायची. 'Not Failure, but low aim is crime.' असं इंग्रजीत एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्याचा अर्थ आहे की अपयश मिळाले तरी बेहत्तर, पण महत्त्वाकांक्षा उच्चच असायला हवी. आपणाला या संदर्भातले एक व्यावहारिक वास्तवही समजून घ्यावे लागेल. चंद्रावर नेम धराल तेव्हा तो झाडालाच लागतो हे विसरता कामा नये. स्वप्ने पाहण्यात दारिद्रय का? प्रयत्नांची पराकाष्ठा करा, वाळूतूनही तेल निघेल (हे रिलायन्सनी खरे करून दाखवलेय!) त्यामुळे उच्च शिक्षणास पर्याय नाही. प्रत्येकाने उच्च शिक्षण घेतलेच पाहिजे. आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतास सन २०२० पर्यंत महासत्ता बनवण्याचे स्वप्न दिले होते. त्यामागे एक आधार होता की येथून पुढच्या काळात देशातील प्रत्येक तरुण पदवीधर होईल.

 महाराष्ट्र शासनाने सन १९६० मध्ये आपलं राज्य साक्षर करण्याच्या उद्देशाने प्रौढ साक्षरता चळवळ राबवली. राज्य साक्षर केल्यानंतर आपण दहाव्या, अकराव्या पंचवार्षिक योजना काळात ‘सर्वशिक्षा अभियान' यशस्वी करून ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलास शाळेत दाखल करून किमान सातवी पास नागरिक करण्याचे उद्दिष्ट साध्य केले. प्रत्येक प्राथमिक शाळा आपण वर्ग खोल्या, शैक्षणिक साधने, प्रसाधनगृह, पेयजल, संगणक इ.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१८४