पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नव्या युगाच्या शिक्षणाचे आव्हान

 ‘आंतरभारती' विचाराची शिक्षणातील गरज आजच्या जागतिकीकरणाच्या काळात नव्याने पाहण्याची गरज आहे. काळ बदलला की जनमत बदलते. जनमत बदलले की जनाकांक्षा बदलतात व शिक्षणाचे स्वरूप बदलणे अपरिहार्य होते. शिक्षणसंस्था व शाळांचा प्रयत्न सतत समकालीन आव्हानांना सामोरे जात ध्येय व मूल्ये उराशी बाळगत नव्या कौशल्यांचे शिक्षण दिले तरच विद्यार्थी शाळात येणार व नवे प्रश्न, जीवन पेलू शकणार. या संस्था स्थापन झाल्या तो काळ शिक्षणाच्या दृष्टीने ‘श्री आर’ (3Rs.) चा होता. Reading, Writing and Arithmetic आले की शिक्षण झाले. लेखन, वाचन व गणित हे विषय स्वातंत्र्यपूर्व काळातील निरक्षर समाजास साक्षर करण्यास पुरेसे होते. स्वातंत्र्यानंतर आपण सन १९७५ मध्ये नवशिक्षणाचे धोरण स्वीकारून १०+२+३ आकृतीबंध स्वीकारला. सन १९८६ मध्ये ‘शिक्षणाची नवी आव्हाने' या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शैक्षणिक पुनर्माडणी केली. एकविसाव्या शतकाचा प्रारंभ आपण सर्व शिक्षा अभियान' स्वीकारून केला. सन २००९ ला आपण सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षक कायद्यान्वये प्राथमिक शिक्षण इ. १ली ते इ. ८ वी चे करून माध्यमिक शिक्षण दोन वर्षांचे केले. सध्या महाराष्ट्रात ८+२+२+३ असा नवा आकृतीबंध लागू झाली आहे. राष्ट्रीय साक्षरता मिशन, सर्व शिक्षा अभियान यशस्वी करून आपण बाराव्या पंचवार्षिक योजनेत आता (२०१३ ते २०१८) राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान' राबवू लागलो आहे. हे अभियान दुसरे -तिसरे काही नसून 'युनेस्को 'च्या 'Global Education Digest -2012' ची ती अंमलबजावणी आहे. या अहवालातून असे लक्षात आले आहे की जगातील

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१७९