पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राजकारणातील सुशिक्षित नि सुसंस्कृत शिवाय संवेदनशील कार्यकर्ते असताना त्या शिक्षकाचे स्वप्न वास्तव बनण्यास अडचण राहण्याचे कारण नाही. मतदार क्षेत्राबाहेर विकास कार्य करण्याची व्यापकता येईल तरच इथले चित्र बदलेल.
 काही दिवसांपूर्वी एका साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी कपिलेश्वर तळाशी, सरवडे (ता. राधानगरी) येथील शाळेत गेलो होतो. तिथल्या कार्यालयातील साच्या भिंती या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय यश संपादन करणाच्या विद्याथ्र्यांच्या यादीने भरलेल्या होत्या. नंतर मी त्या तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. राधानगरी तालुक्यात वर्षानुवर्षे तेथील शिक्षक दिवसरात्र मेहनत घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेत धवल यश संपादन करतात. ही मोहीम आपण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात का नाही निर्माण करत?
 केरळ, तमिळनाडूसारख्या राज्यात फिरत असताना माझ्या असे लक्षात आले की तिथल्या खेड्यापाड्यांतल्या प्राथमिक शाळांच्या विकासात गावातील लोक मोठा भाग घेतात. म्हणजे शाळांना साधने, सुविधा पुरवितात. प्रत्येक गोष्ट शासनाने केली पाहिजे ही सामाजिक मानसिकता आता दूर झाली पाहिजे. जिल्हा परिषदांच्या शाळा ज्या गावात आहेत तिथे अनेक ठिकाणी पतसंस्था, दूध डेअरी आहेत. त्यांनी आपल्या फायद्याच्या काही हिश्श्यातून शाळा समृद्धी का नाही करायची? एका डिजिटल बोर्डच्या खर्चात संगणक येत असेल तर वाढदिवसादिवशी गावच्या पुढा-यांनी आपला वाढदिवस पुस्तके, संगणक, एल.सी.डी., प्रोजेक्टर, एल.ई.डी., टी.व्ही. देऊन का नाही साजरा करायचा? मागे केव्हातरी मी कांबळवाडीला माझ्या कॉलेजच्या सर्व विद्याथ्र्यांना प्राचार्य असताना घेऊन गेलो होतो. तिथली कंथेवाडी येथील प्राथमिक शाळा मी पाहिली होती. ती साधी पण सुंदर बाग असलेली शाळा माझ्या अजून लक्षात आहे. एस.टी. च्या प्रवासात मी रस्त्यालगतच्या कितीतरी शाळा डोळे भरून पाहात असतो. त्यांच्या भिंतीवर मला हमखास नकाशे, नेत्यांचे फोटो, सुविचार दिसतात. शाळेचा परिसर मला कधीच घाण आढळला नाही. या छोट्या गोष्टीतूनही विद्यार्थी घडतात अशी माझी धारणा आहे.

 प्रश्न आहे तो समस्यांशी स्वतःहून भिडण्याचा. परिपत्रक आले, ते केले की संपले' या वृत्तीतून बाहेर पडून जिल्हा परिषद शाळांतील प्रत्येक शिक्षक उपक्रमशील होईल तर कोल्हापूर जिल्हा बदलून जाईल. साधना प्रकाशन, पुणे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव माळी यांचे प्रकाशित

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१६८