पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 समाजसुधारक शिक्षक होते. ती परंपरा १९ व्या शतकातील विविध समाज कार्यातून सुरू झाली होती. आर्य समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, थिऑसॉफिकल सोसायटी, सत्यशोधक चळवळ यातून शिक्षण प्रसारास अनुकूल वातावरण तयार झाले होते. म. फुलेंनी सन १८५२ मध्ये दलितांसाठी शाळा सुरू करून वंचित शिक्षणाचा पाया घातला होता. प्राथमिक शिक्षणात मुलींना शिकविण्याचे श्रेय त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना द्यावे लागेल. पुढे विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील प्रभृतींनी हे कार्य अंगिकारले. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यास चळवळ व कायद्याचे अधिष्ठान दिले. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात कोल्हापूर संस्थानातील प्राथमिक शिक्षण गावागावात जाऊन पोहोचले होते. स्वातंत्र्यापूर्वी कोल्हापूर संस्थानात १२९९ म्हणजे सुमारे १३0 0 प्राथमिक शाळांची स्थापना झाली होती. विद्यार्थी संख्या ८८,५१० झाली होती. त्या वेळी संस्थान प्राथमिक शिक्षणावर वार्षिक १३,८८,११५ रुपये खर्च करत असे. संस्थानचे साक्षरता प्रमाण त्या वेळी १३% होते. तोवर संस्थानचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा संस्थानातील सर्व जहागिन्यांना लागू करण्यात आला होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर साक्षरता मिशन यशस्वी झाले. ऑपरेशन ब्लॅकबोर्डसारख्या योजनातून शाळेच्या भौतिक समृद्धीचा विचार झाला. सर्वशिक्षा अभियानमधून प्राथमिक शिक्षणात गुणात्मक बदल दिसू लागले. एकशिक्षकी शाळांच्या जागी बहुशिक्षकी शाळा आल्या. सन २००८ च्या सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण कायद्याने ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला. या सर्वातून आपणास एक गोष्ट लक्षात येईल की भारतात नि महाराष्ट्रातही प्राथमिक शिक्षण हा या देशाचा केवळ जिव्हाळ्याचा प्रश्न न राहता तो अग्रक्रमाचाही मानला गेला आहे.

 गेल्या शतकात प्राथमिक शिक्षकांचे एक रोल मॉडेल म्हणून साने गुरुजींकडे पाहिले जात होते. 'गुरुजी' हा शब्द गेल्या शतकाच्या पूर्वार्धात अत्यंत आदराने उच्चारला जायचा. थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक ‘कृतीशील शिक्षक परिषद'मध्ये बोलताना सन १९८0 ला म्हणाले होते की, ‘समाजाच्या लेखी शिक्षक हा विधवेसारखा असायला हवा असे गृहीत होते. याचा अर्थ असा की कितीही संकटे आली तरी शिक्षकासाठी नैतिक आचार व विचार हे अनिवार्य असतात. एकविसाच्या शतकाचे पहिले दशक संपून गेले आहे. आज शिक्षकाचे चित्र, चरित्र, चारित्र्य यापुढे समाज एक मोठे प्रश्नयेऊन ठेपली आहे. सध्या शिक्षकाचे वेतन समाधानकारक असल्याने

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१६४