पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘माझे ते माझे नि त्याचेपण माझेच' असे दुहेरी स्वामित्व त्यात येते ते स्वार्थ, स्व, आत्मसंस्कार या वस्तुपाठातून. वैयक्तिकतेपलीकडे जग नाही असे मुलांना लहानपणापासून वाटते ते आपण त्यांना घरात कोंडून त्यांचा सामाजिक कोंडमारा केल्यामुळे. समाजाशी त्याचा संपर्कच होऊ दिला नाही, तर समाज त्याला कळणार कसा? खेळायला जायचे नाही, शेजारी बोलायचे नाही, शाळेचा डबा भिंतीकडे तोंड करून डोळे मिटून खायचा, वॉटर बॉटल कुणाला द्यायची नाही, खोडरबर हरवला तर पट्टीचा मार नि पट्टी हरवली तर कमरेच्या पट्ट्याचा मार त्या मुलांना आपण इतरांशी तोडत आपल्याशीपण तोडून टाकतो, हे आपल्या लक्षातच येत नाही. कारण आपल्यालाच सामाजिकतेचा रातांधळेपणा आलेला असतो. समाजाची गरिबी, दारिद्र्य, अनवाणी चटके, अपंगत्व, अनाथपण, अंधत्व इ. समाजवास्तव पहाण्या, अनुभवातून जितके भावते, भिडते ते भाषण, संवाद, समजून सांगण्यातून नाही उमजत. वाढदिवसाला गोळ्या वाटणे, रिटर्न गिफ्ट, नो बुके, ओनली ब्लेसिंग म्हणून मुले लोनलीच होणार ना? हॅपी बर्थ डे' पुरते जाणे-येणे नाती नाही निर्माण करत. ती फक्त सहअस्तित्वाची जाणीव देतात. मुलांना त्यांच्या वयाच्याच दुस-या मुलांचे जीवन, शल्य, सुख, समाधान सारे -मूल असतानाच कळायला हवं. द्यायचा संस्कार, मिळून खाण्याचा आनंद, उपासाचे चटके ज्या त्या वेळी, ज्या त्या वयात कळले तरच ते कालजयी ठरतात. विटी-दांडू, गोट्या, गजगे, जिबली, सूर, आट्यापाट्या, लपंडाव, भातुकली खेळ आणून देऊन चालत नाही. त्या खेळातले आक्रमण, आघात, बचाव, हातात हात घेणे, हसणे, रडणे, खरचटणे, पडणे, पाय मोडणे जोवर होत नाही, तोवर त्यांना सहज बालपण (Natural Childhood) मिळत नसतं. ‘पडो, झडो, माल वाढो' म्हटलं जातं त्याचा अर्थ पालकांनी समजून घ्यायला हवा. आपण कसे मोठे झालो? आपले बालपण किती समाजशील होतं, हे आठवलं तरी पालकांना आपल्या चुका लक्षात येतील. पालकांचे पालक (मुलांचे आजी-आजोबा) अल्पशिक्षित, अडाणी, जुने असतील पण ते शहाणे, सुरते होते म्हणून तुम्हाला हे दिवस आले, हे विसरून कसे चालेल? शिक्षण, संस्कार जगण्यातून मिळायला हवेत. उपदेश समजावतात, आचार वर्तन परिवर्तन घडवत असते. आपल्याला शिकवायचे असते. मुले पाहिली की त्यांची घरे, पालक, शिक्षक कसे असतील हे माझ्या लगेच लक्षात येत राहिले आहे.

 ‘शिष्टता नको, समाजशीलता हवी' हा या एकविसाव्या शतकात समाजमंत्र आहे. शिक्षण नको, शहाणपण हवे' हे मला माझ्या अशिक्षित

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१३८