पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सालच्या जनगणनेतून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा कमीच आढळते. विशेष म्हणजे शिक्षण व समद्धी दोन्ही वरदान ज्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना लाभलं तिथं स्त्री भ्रूणहत्या अधिक होत्या. पालकांना मुलगी नको असं वाटणं एके काळी हुंडा प्रथा होती म्हणून. पण आता ती प्रथा दूर झाली तरी मुलींची जोखीम संपली नाही. शिक्षण, नोकरी, क्लास, प्रवास इ. मुळे मुलींचं घराबाहेर राहणं अटळ होणं हा पालकांसाठी चिंतेचा विषय होऊन राहिला आहे. म्हणून ‘सातच्या आत घरात' सारखे नाटक, चित्रपट येतात. अलीकडे पंजाब, हरियाणामधील गुजर समाजाने मुलींवर स्कार्फ बंदी आणली. या सर्वांतून ‘मुलगी' हा पालकांच्या काळजी व जबाबदारीचाच विषय बनून राहतो का आहे हे लक्षात येते. या मागे आपल्या मनात लिंगभेदाचे जे भूत आहे, तेच त्याचे कारण होय. मुलगा-मुलगी समान भावनेचे बाळकडू घरातून सुरू झाले पाहिजे. जन्माला येणारे बाळ मुलगा- मुलगी काही असो स्वीकारण्याची मानसिकता तयार होणे हा समाज परिवर्तनाचा मूलभूत भाग आहे. तो झाला तर मग मुलगामुलगी भेदाचे आहार, आरोग्य, शिक्षण, वर्तनसारखे पैलू मग ऐरणीवर येतील. प्रसूतिपूर्व लिंग चाचणी बंदीचा नुसता कायदा होऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्याला समाजप्रबोधनाची गरज आहे. व्यवहारातील समानता हाच त्यावरील खरा उपाय आहे. युरोपात जी समभावना आहे. ती आपणाकडे येईल तर स्त्रीपुरुष भेदाचा प्रश्न संपुष्टात येईल. प्रसूतिपूर्व लिंग चिकित्सा करणे नवदांपत्यांना आवश्यक वाटणार नाही तेव्हाच प्रसूतिपूर्व लिंगभेदाचा प्रश्न सुटेल. स्त्रियांनी याबाबत आग्रही राहणं महत्त्वाचं. गर्भधारणा पुरुषामुळे होते, पण गर्भरक्षण ही स्त्रीचीच जबाबदारी वा गर्भ हा स्त्रीचा अधिकार अशी समाजमान्यता तयार झाली तर हा प्रश्नच राहणार नाही.
बालसंगोपन

 बालसंगोपनाचा पालकांना मिळणारा आनंद कधीकाळी स्वर्गसुखापेक्षा कमी नव्हता. घर भरलेले होते. भरल्या घरातलं मूल अंगाखांद्यावर खेळत मोठे व्हायचे. त्याला आईचं दूध नि कूस दोन्ही लाभायची. आजीबाईच्या बटव्यातील ओवा, वेखंड, हळकुंड, बडीशेप, लवंग खात बाळाचे आजार दूर व्हायचे. तेलपाणी व्हायचे. दृष्ट निघायची. त्यातील दैवी भाव सोडला तर डोळ्यात तेल घालून बाळाची काळजी घेतली जायची. तीट, काजळ घालत काळजी व्हायची. या सान्याची जागा आज काँप्लान, अमूल, लाइफबॉय, डेटॉल, हगिज, जॉनसन कंपन्यांनी घेऊन पिढीचे संगोपनच दत्तक घेतल्यात जमा आहे. मधल्या काळात फिगर कॉन्शस झालेल्या आयांनी अंगावर

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१२०