पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बेंगलोर, चेन्नई, कलकत्ता, दिल्लीसारखी शहरे माहिती, तंत्रज्ञान, विज्ञान, उद्योग, कारखाने, व्यवसाय विकासाची मुख्य आगरे (र्कील) बनत असल्याने तरुण वर्गाचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. विदेशी नोकरी ही माहिती, तंत्रज्ञान क्षेत्रात नवी नाही. या क्षेत्रातील युवक अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड इ. देशात सर्रास जातात नि स्थायिक होतात. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे आई-वडील विदेशी जाणे ही नित्याची गोष्ट झाली आहे. दहा घरातील एक परदेशी असतो म्हणजे स्थलांतरित असतो. उच्च मध्यमवर्गीयांत हे प्रमाण प्रत्येक घरावर येऊन ठेपले आहे.
 जागतिकीकरणाचा अटळ परिणाम म्हणून होणाच्या स्थलांतराचे, गलेलठ्ठ पगारांचे चांगले, वाईट परिणाम भारतीय कुटुंबांवर होऊ लागले आहेत. भौतिक संपन्नता, पाश्चात्त्य संस्कृतीची स्वीकृती, इंग्रजीचा वापर, चंगळवाद हे मध्यमवर्गीय कुटुंबांवर होणारे परिणाम जागतिकीकरणाचेच होत. यांची अपत्य पिढी ‘सांस्कृतिक संकरित पिढी' (Hybrid Culture Ganaration) म्हणून वाढते आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषा शाळा, टी.व्ही., घरामुळे शिकणारी ही पिढी प्रथम मातृभाषेस, नंतर मातृभूमीस व शेवटी मातृत्वासच पारखी होते आहे. धड भारतीय नाही, धड विदेशी नाही अशा स्थितीत ती भौतिक संपन्नतेच्या प्राणवायूवर तरून जाईल पण अस्तित्वशोध हरवलेले हे क्रौंचवध संस्कृतीशापित मात्र कायमचेच होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नागरीकरण

 खेड्याकडून तालुका, जिल्हा, राजधानी, मोठी शहरे यांकडे स्थलांतरित होण्याचा कल भारतभर दिसून येतो. त्यामुळे गावे ओस पडलेली नसल, तरी त्यांचे चैतन्य हरवले आहे निश्चित. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण शहर होणं, शहरांची महानगरं होणं व महानगरांचं मेट्रो होणं आता क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पूर्वीची संयुक्त कुटुंबपद्धती खेड्यापुरती टिकून आहे. शहरात छोटे व विभक्त कुटुंब सोयीचे. ते तुम्हास सर्वच स्तरावर दिसून येते. नागरीकरणाचे परिणाम कुटुंबाच्या आकारावर जसे झाले तसे त्यांच्या जीवनशैलीवरही.रोजचा दूरचा प्रवास, नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं दिवसातले जवळजवळ सर्व तास बाहेर राहणं, मुलांचं शाळा, क्लासमुळे बाहेर राहणं यामुळे घरांना प्रतीक्षालय (Waiting Room) वा विश्रामगृहाचे (Lodge) स्वरूप येत आहे. यातून मुलांच्या सामाजीकरण, पौगंडावस्थेत एकाकीपण, तारुण्यात पालकांच्या अभावी समान मित्रगटात राहणं यातून विकासाचे नित्य नवे प्रश्न निर्माण होत आहेत. नागरीकरण जागतिकीकरणाची अटळ परिणती जशी, तशी घराचं

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/११५