पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रेटा. ही सारी स्थिती विकसनशील देशात असते. कारण तिथं एकाच वेळी दोन समांतर संस्कृती नांदत... विकसित होत राहात असतात. एक संपन्नतेतून जन्मते तर दुसरी दारितून! कुणी तरतं, कुणी मरतं. अशाश्वततेचा शाप हे जागतिकीकरणाचं लक्षात न येणारं अरिष्ट होय.
जागतिकीकरणाचे भारतीय कुटुंबव्यवस्थेवरील परिणाम
 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने चतुर्दिक विकासाचे जे धोरण स्वीकारले त्यामुळे भारतात शेतीबरोबर उद्योगांचा विकास झाला. शेती क्षेत्र सिंचनाखाली आल्याने शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ झाली. दळणवळणांच्या साधन विकासामुळे खेडी शहरास जोडली गेली. पोस्ट, वीज, पाणी, रस्ते, बस, रेल्वे, टेलिफोनचे जाळे पंचवार्षिक योजनेनिहाय विस्तारित गेले. शिक्षणमान वाढले. साक्षरता प्रसाराची जागा सर्वशिक्षा अभियानाने घेतली. उच्च शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणाचा प्रचार झाला. स्त्री जन्म, स्त्री शिक्षण, स्त्री नोकरीबाबत हा प्रबोधनकाळ होता. कुटुंब नियोजनास प्राधान्य दिल्याने सन १९७५ नंतर ‘हम दो, हमारे दो'चे चौकोनी कुटुंब प्रथम नागरी भागात नि सन १९९० नंतर ग्रामीण भागात दिसू लागले. ग्रामीण भागातील नागरिकांचे शहराकडे वाढते स्थलांतर झाल्याने संयुक्त कुटुंबांची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली.
 जागतिकीकरणानंतर सर्वत्र आधुनिकतेचा प्रचार, प्रसार गतीने झाला. यात टी.व्ही. वाहिन्या, संगणक, मोबाईल्स, मोटार बाईक्स यांनी मोलाची भर घातली. शिक्षणाबरोबर अर्थमान उंचावल्याने स्त्री-पुरुष समानता, गरीब श्रीमंतीचे अंतर कमी होणे, ग्रामीण भागाचे नागरीकरण, रोजगारकेंद्रित मनुष्यविकास झाला. व्यवसाय वा शेतीऐवजी नोकरीस प्राधान्य मिळाले. जीवनात स्थैर्य यायचे तर निश्चित उत्पन्न हवे, या विचाराने स्त्री मिळवती होण्याचे प्रमाण वाढले. विकास योजना, विश्व बँकांचे कर्ज, परदेशी कंपन्यांचे आगमन इ. तून पायाभूत विकासात गती आली. गेल्या दोन दशकातील जागतिकीकरणाचे कुटुंबावर झालेले परिणाम समाजजीवनावर मूलभूत प्रभाव टाकणारे व पुरोगामी परिवर्तन करणारे ठरले असे स्थूल चित्र पुढे येत असले, तरी सूक्ष्मपणे पाहता ते मानवी संबंधांपेक्षा भौतिकतेस महत्त्व देणारे दिसून येते.
घटते जननप्रमाण

 विशेषतः युरोपीय देशातील समृद्धीतून भारतासारख्या विकसित व महासत्ता होऊ पाहणा-या देशाला विश्वसंपर्कातून लहान कुटुंबाचे महत्त्व पटले. कुटुंब नियोजनाचा प्रचार, शिक्षण प्रसार, आरोग्याविषयीची वाढती जागृती, स्थावर संपत्तीतील घट इ. मुळे भारतात अपत्य प्रमाण घटले. अष्टपुत्र सौभाग्यवती

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१११