पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाकली मूठ रोज आवळते आहे. नैतिक शिथिलता कुटुंब व समाजमान्य होत आहे ती जागतिकीकरणातून अटळपणे आलेल्या मुक्त संबंधांमुळे. जागतिकीकरण ही नुसती मुक्त अर्थव्यवस्था नाही तर ती स्वैर जीवनाचा मुक्त परवाना आहे. हेच संबंधांचं उदारीकरण, लैंगिकतेचे खासगीकरण व संस्कृतीचे जागतिकीकरण होय. सांस्कृतिक संकराशिवाय सामाजिक जागतिकीकरण होऊ शकत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यातून विभाजित व्यक्तित्वं (Slit Perronality) जन्मते. तिची इतिश्री माणसाच्या मनुष्य' म्हणून असलेल्या ओळखीच्या विसर्जनात (Immerrion of Identity) होत असते हे आपणास विसरून चालणार नाही.
 माणसाच्या दृष्टीने जागतिकीकरण एक मोठा गुंता (Comlew) आहे। खरा, ‘धरलं तर चावतं नि सोडलं तर पळतं' अशी याची स्थिती आहे. तुम्ही स्थानिक राहिलात तर मागं पडण्याची भीती, वैश्विक झालात तर या क्षणी प्रतिष्ठित पण भविष्यात परागंदा होणार याची खात्री जागतिकीकरणाने माणसास ‘धोबी का कुत्ता' बनवलाय खरं! 'न घर का, न घाट का!' आज हा ‘भ्रम' वाटेल, पण ते उद्यांचे ‘सत्य' होय. जागतिकीकरण एक भूलभुलय्या आहे. माणसास ते नादावतं, भ्रमिष्ट करतं नि नंतर तो पतनोन्मुख होतो. जागतिकीकरणापासून दूर राहणा-याला आपण कालबाह्य, अस्पृश्य होऊ असं वाटतं. तो संसर्गी होणं पसंत करतो. पोषाख, खाणं, राहणीमान, विचार, व्यवहार इ. मध्ये भारतात गेल्या दोन दशकात आलेली गती पाहता विश्वासच वाटत नाही की इथे नैतिकता, सदाचार, साधेपणा, सच्चाई यांचे राज्य होतं. हे व्यक्तित्व संघर्षातून (Identity Crisis) सारं येतं नि आलंय. हा प्रश्न तरुण वर्गासाठी यक्षप्रश्न झालाय खरा.

 या तरुण वर्गात जागतिकीकरणाने आणखी एक बदल घडवून आणला आहे तो म्हणजे स्वकेंद्रित संस्कृतीच्या स्वीकृतीचा. समान वयाचे, समान विचाराचे, समान धर्मीय, समान दृष्टिकोनाचे, समान व्यावसायिक आपला एक छोटा गट तयार करतात. खरं तर ते अस्तित्वाचं छोटं, समाजापासून तुटलेलं बेट तयार करतात. फेसबुक, ऑर्कुट, ब्लॉग्ज, ट्विटर इ. सोशल नेटवर्किंगचं हे अपत्य म्हणावं लागेल. ते आपली कम्युनिटी (खरं तर टोळकं!) तयार करतात, न भेटता बोलतात, संवाद करतात, शुभेच्छा देतात. कल्पनेचाच बुके, कल्पनेचाच सहवास नि संवाद! स्वस्वीकृत सामुदायिक संस्कृतीत १00 मित्र पण प्रत्यक्षात गरज, मदतीला कोणीपण नाही. तुम्हीच तुमचे' असं एकाकी जीवन स्वीकारणारी ही आत्मकेंद्री जमात जागतिकीकरणाने जन्माला घातली आहे. प्रत्यक्ष शेजारी राहणा-याच्या मयताला जायचं नाही

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१०९