पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागतिकीकरणाचे सकारात्मक परिणाम

 जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरणाच्या विविध परिणामांमुळे भारतातील सकल घरेलू उत्पादन (GDP) सरासरी दर १.५% ने वाढला. अकराव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत १०% दरवाढीचे लक्ष्य मनमोहन सिंग सरकारला आंतरराष्ट्रीय पेट्रोल दर, चलन किमतीतील चढउतार, युद्ध, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती इ. मुळे गाठता जरी आले नसले तरी देशाने विकासाच्या सर्व क्षेत्रात आघाडी घेतली हे मात्र नाकारता येणार नाही.
 २००१ साली परदेशी चलन संग्रह केवळ ४० दशलक्ष डॉलर्स होता, तो २००७ सालापर्यंत १८0 दशलक्ष डॉलर्सपर्यंत भारत नेऊ शकला. तेही सर्व क्षेत्रातील विकास दर कायम ठेवून.
 विदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रात सन २00६ पर्यंत भारताने १,८१,५६६ कोटी रुपयांचे लक्ष्य गाठून महासत्तेच्या दिशेने मुसंडी मारली असे म्हणले तर ते अतिशयोक्त होणार नाही. जगाच्या आऊट सोर्सिंग व्यवसायापैकी ४५% व्यवसाय एकट्या भारताचा होऊ शकला यातच आर्थिक विकासाचे रहस्य सामावलेले दिसते.
 जगाच्या व्यापार, उद्योग, गुंतवणूक, विकास इ. क्षेत्रात अमेरिका, चीन, जपान, नंतर भारताचा क्रम लागणे यातच देशाचे आर्थिक मान वाढत असल्याचे प्रतिबिंब दिसते. फोर्सच्या यादीतील ४० अब्जाधीश भारतातील असणं हे कशाचं लक्षण?
 या सर्वांमुळे भारतात सेवा क्षेत्र विस्तारित झाले. येथील संस्कृती आधुनिक बनली. सर्वसामान्यांचे विशेषतः मध्यमवर्गीयांचे जीवनमान उंचावले. जीवनशैली उपभोगी बनली. भांडवली विकास झाला. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विस्तारामुळे शिक्षण, आरोग्य, पर्यटन क्षेत्र अत्याधुनिक झाले. टी.व्ही., सिनेमा, दळवणवळण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले. मल्टिप्लेक्स, मॉल्स, मोबाइल्स, मोटर्सनीच बाजार भरला असे नाही, तर घरोघरी बाईक्स, टी.व्ही, वॉशिंग मशिन्स, किमती फर्निचर, टाइल्स, टुरिझमचे वारे वाहू लागले. कधी काळी बचतप्रधान असलेला देश खर्चीक झाला. रोजगाराच्या संधी वाढल्या. लालफितीचा कारभार शिथिल झाला.
जागतिकीकरणाचे दुष्परिणाम

 असं नाही की जागतिकीकरणामुळे भारतात सर्वत्र विकासाची फळेच फळे नि विकासाचे मळेच मळे फुलले. नाण्याला दुसरी बाजू असते त्याप्रमाणे जागतिकीकरणाचे दुष्परिणामही भारतात पाहावयास मिळाले. शेतक-यांच्या आत्महत्या हे जागतिकीकरणाचं देशावरचं ठळक अरिष्ट म्हणून नोंदवता

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१०४