पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आश्रमशाळातील मुलींना न्हाणीघराची सुविधा नसल्याने नदीवर अंघोळीस जावे लागते, असे दिसून आले. काही आश्रमशाळांमध्ये तर मुले जिथे राहतात तिथेच वर्ग भरतात असे लक्षात आले. २६ जानेवारी, २०१६ रोजी या वृत्तपत्र प्रतिनिधीने त्रिशूल नामक खेड्यातील आश्रमशाळेस भेट देऊन जी वस्तुस्थिती वर्णिली आहे, ती वाचता लक्षात येते की, अशा शाळा न चालवणे अधिक हिताचे. विद्यार्थ्यांचे तंबाखू खाणे नि शिक्षकांचे दारू पिणे सर्रास दिसत असेल तर दुसरे काय म्हणता येणार? (Status of Ashram School in Mah. Pg. 12)
 दलित, वंचित बाल्य असामाजिक सर्पदंशाच्या विळख्यात
 महाराष्ट्रात दलित, आदिवासी मुला-मुलींच्या निवास, भोजन, शिक्षण सुविधांसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात; तर अनाथ, निराधार वंचित बालकांसाठी निरीक्षणगृहे, बालगृहे, अनाथाश्रम, बालिकाश्रम, इत्यादी. दोन्हीकडील दलित आणि वंचित बाल्य हे सदर संस्था चालविणाच्या संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराचे बळी आहेत. काही सन्मान्य अपवाद वगळता संस्थाचालक व शासकीय अधिका-यांच्या अभद्र युती व हातमिळवणीमुळे ही मुले-मुली उपेक्षा नि दुर्लक्षतेचे बळी ठरत आहेत. या संस्थांत सर्रास संस्थाचालकांच्या घरातील लोकच कर्मचारी म्हणून नियुक्त असतात. शासकीय पगारामुळे त्यांना जीवनशाश्वतीचे वरदान; पण बळी मात्र मुलांचा. शासनदेय अनुदान आणि वेतन नियमित देत नसल्यानेही अनेक अनियमितता आढळून येतात. अनेक शासकीय आश्रमशाळा व बालकल्याण संस्थांत शिक्षक, कर्मचारी पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. पालक, शिक्षकच नसतील तर बाल्य विकसित कसे होणार?
 अलीकडच्या काळात वारंवार प्रकाशित होणा-या खालीलसारख्या बातम्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यास निरंतर बेचैन अशासाठी करीत राहतात की आपण गेली चार दशके सतत कार्य करूनही संस्थांची सुधारणा, दर्जा उंचावणे, कर्मचारी प्रबोधन, शिक्षण गुणवत्ता वाढ करू शकलो नाही. आपला दलित, वंचित विकास हा विस्तार, प्रसार आहे. त्यात कल्याण व मनुष्यबळाचे सबलीकरण, संवेदन, पुनर्वसन भाव कमी-
 • आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या. (उल्हासनगर, २० मार्च, २०१३/टाइम्स ऑफ इंडिया)

 • आदिवासी कन्येचा आश्रमशाळेतील आचाच्याकडून विनयभंग. (जव्हार/१६ ऑक्टोबर, २०१५/आउटलूक)

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१३४