अरबी आतिथ्यास सीमा नसे, जवळ असेल तें सारे पाहुण्यांसाठी ठेवायची अरबी नीति होती. आतिथ्यांत उणीव उरत असेल तर दूध देणारी उरलेली शेवटची उंटीणहि तो मारी व रसोयी करी. हातिमताईच्या गोष्टी जगप्रसिद्ध आहेत. ताई कुळांतील तो हातिम अति शूर अति उदार होता. तो कविहि होता. त्याचे जीवनच काव्य होतें. आतिथ्याचा तो आदर्श होता. एकदा मोठा दुष्काळ होता. हातिमहि अन्नान्नदशेला पांचला होता. एकदां सबंध दिवसांत त्याच्या कुटुंबांतील मुलांमाणसांच्या पोटांत कांहीं अन्न गेलें नव्हतें. रात्रीच्या वेळेस गोष्टी सांगून त्यानें मुलांना रमवलें, तीं बाळें झोंपीं गेलीं. गोष्टी सांगण्यांत अरबांची बरोबरी कोणी करूं शकणार नाहीं! मुलें निजल्यावर पत्नीनें सुद्धां भूक विसरून जावें म्हणून तिच्याशीं तो गोष्टी विनोद करीत होता. इतक्यांत तंबूजवळ कोणीतरी आलें.
"कोण आहे?"
"मी तुमचा शेजारी. मुलांना आज खायला कांहींहि मिळालें नाहीं. लांडग्यांप्रमाणें वखवखलीं आहेत. तुमच्याजवळ मदत मागायला आलों आहे."
"तुझीं मुलें घेऊन ये." हातिम म्हणाला.
तो मनुष्य गेला.
१६ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/३०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे