या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हाच आहे. या भागाकडे समाजाचें - विशेषतः भगिनीवर्गाचें-जितकें लवकर
व अधिक लक्ष जाईल, तितकें समाजसुधारणेचें पाऊल पुढें पडेल.
सारांश, ज्ञानसंग्रहाच्या व समाजाच्या प्रगतीच्या अशा दोन्ही दृष्टीनीं
प्रस्तुत पुस्तकाची उपयुक्तता मोठी आहे व त्याचा जन्मही अत्यंत समयोचित
झाला आहे असे मला वाटतें. हे माझे मत या प्रस्तावनेच्या द्वारें प्रांजलपणें
सांगण्याची संधि मला दिल्याबद्दल व अशा उपयुक्त व परिश्रमपूर्वक लिहिलेल्या
पुस्तकास प्रस्तावना लिहिण्याचा मान दिल्याबद्दल रा. 'ऋग्वेदी ' यांचे आभार
मानून सुज्ञ वाचकांच्या हातीं हैं पुस्तक मी मोठ्या आनंदानें देतों.
आनंदमंदिर,
इंदूर, ता० २८।३।१६. } बासुदेव गोविंद आपटे.