पान:आमची संस्कृती.pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८४ / आमची संस्कृती

ते नवी दृष्टी देते व जुन्या विषयाच्या विचाराला नवी दिशा दाखविते. जो जो लहानमोठा प्रश्न हाती घेतला त्यावर काही तरी नवे व विचारप्रवर्तक भाष्य करणारी त्यांची बुद्धी ‘संचारिणी दीपशिखेव रात्रौ' अशी वाटते.
 डॉ. केतकर यांचे समाजशास्त्रविषयक लेखन त्यांच्या प्रौढ विद्यार्थिदशेपासून तो प्राय: त्यांच्या मृत्यूपर्यंत अव्याहत चाललेले होते. ह्या काळात त्यांनी कादंबच्या व किरकोळ लेख सोडून खालील समाजशास्त्रविषयक ग्रंथ लिहिले :
 History of Castes in India' १९०९
 'Hindustan: its Formation and Future', १९११
 'Hindu Law,' १९१४
 ‘ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड,' १९२०-२३
 ‘भारतीय समाजशास्त्र, १९३६
 ह्या ग्रंथांचा विस्तार आणि त्यांनी सूचित केलेले विविध विषयांवरील सूक्ष्म वाचन केतकरांचे पांडित्य व व्यासंग ह्यांविषयी आपली खात्रा पटवितात. त्यांच्या पहिल्या दोन ग्रंथांतून जातिसंस्था, चातुर्वर्ण्य, हिंदू धर्माचे सामान्य स्वरूप व त्याचे इतर धर्माशी विसशत्व, हिंदू समाजाचा विशिष्ट रचना व त्यातील गुणदोष इत्यादी विषयांवर चर्चा केलेली आहे.पाश्चात्य पंडितांनी हिंदू समाजाचे जे निरीक्षण केले ते एकांगी व पूर्वग्रहदूषित होते. त्यामुळे भारतीय समाजाचा अभ्यास करू इच्छिणा-याला त्याचा फारसा उपयोग होण्यासारखा नाही. पण केतकरांचे ह्या विषयावर संशोधन असामान्य व मूलग्राही असे आहे. त्यांनी पाश्चात्त्य देशात अ करून पाश्चात्त्यांची संशोधनपद्धती आत्मसात केली व ते स्वतः असल्यामुळे त्यांना हिंदूंच्या समाजसंस्थेचे स्वरूप यथार्थपणे आकळता आले, आणि म्हणूनच त्यांचे लेखन मार्गदर्शक झाले आहे. वरील ३५ ग्रंथांतील विचार अधिक विस्ताराने व आग्रहाने ‘हिंदस्थान आणि जग, या विभागात मांडले आहेत. मूळ इंग्रजी ग्रंथांतच त्यांची विचाराचा " ठरून गेलेली आहे- विशेषत: ‘हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात हि धर्मावर व चातुर्वण्र्यावर त्यांनी प्रकट केलेले विचार काही ठिकाणी 'Hindustan : its Formation and Future' निबंधावरूनच शब्दश: मराठीत उतरविलेले आहेत. ह्या पुस्तकातच पुढे