पान:आमची संस्कृती.pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७२ / आमची संस्कृती

स्वकीयांशी भांडण्याचे धैर्य देई. स्वत:च्या धर्मात शिरलेल्या दुष्ट रूढींविरुद्ध त्यांनी दिलेला झगडा हे पाखंड नसून एक प्रकारचे धर्मयुद्धच होते.

 समाजसुधारणेचे मर्म व आचरणातील पथ्य
 आगरकरांच्या आयुष्यातील ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यांच्या बुद्धीची शुद्धता त्यावरून समजून येते. आपल्या समाजातील रोगांना कंटाळून समाज सोडून देऊन चालणार नाही हे त्यांनी व इतर महाराष्ट्रीय समाजसुधारकांनी ओळखले होते. उपहास झाला, बहिष्कार पडला, निंदेचे प्रहार झाले तरी ते सोसावयाचे, पण समाजावर रागावून बाहेर पडावयाचे नाही, तरच समाजाची सुधारणा होईल हे आगरकरांनी फार स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. ज्या देशात आपले शेकडो पूर्वज जन्मास आले, वाढले, मरण पावले; ज्या देशातील हजारो पिढ्यानी अनेक गोष्टींत मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचे फळ आपणास आयतेच प्राप्त झाले, अशा देशांतील धर्माचा, रीतिरिवाजांचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणा-या मनुष्यास खच्या सुधारकाची पदवी कधीही शोभणार नाही. स्वभूमीत, स्वलोकांत, स्वधर्मात आणि स्वाचारांत राहून, अविचारी व अज्ञान देशबांधवांच्या निंदेस किंवा छळास न भिती त्यांच्याशी कधी भांडून, कधी युक्तिवाद करून, कधी लाडीगोडी लावून, अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांना दटावून त्यांची सुधारणा करणे यांतच खरी देशप्रीती, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरे शहाणपण व खुरा पुरुषार्थ आहे. समाजसुधारणेचे मर्म आगरकरांनी जितक्या स्प४ शब्दांत सांगितले आहे तितक्या स्पष्टपणे ते कोणी दुस-याने मांडलेले मला आठवत नाही. पण आपल्या मागल्या पिढीतील सर्व समाजसुधारकाना ९ कळले होते व त्यांची कृतीही त्याबरहुकूम झाली. आगरकर, टिळक, लोकहितवादी, फुले, कर्वे, शिंदे, गोखले व रानडे पतिपत्नी ही सवय मंडळी वरील तत्त्वाला चिकटून होती व म्हणूनच त्यांच्या प्रयत्नाने सब महाराष्ट्र समाज उजळून निघाला. He chastiseth best, who loveth ६.६ असे एक वाक्य बायबलात आहे. रागावण्याचा. दंडण्याचा हक कोणाला? तर जो अंत:करणपूर्वक प्रेम करतो त्याला. अशा रागावण्याचा