पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने...

 ‘आकाश संवाद'ची पहिली आवृत्ती स्पर्श प्रकाशन, राजापूर जि. रत्नागिरीचे माझे स्नेही व प्रसिद्ध बालसाहित्यिक श्री. मदन हजेरी यांनी काढली होती. दुसरी आवृत्ती अक्षर दालन, कोल्हापूरचे अमेय जोशी काढत आहेत. नव्या आवृत्तीस कोल्हापूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी श्री. श्रीपाद कहाळेकर यांनी माझ्या घेतलेल्या तीन मुलाखतींचा समावेश नव्याने करणयत आला आहे. त्यामुळे मजकुरात नुसती ती भर नि वाढ नसून नव्या विषयांचा नवा विचार म्हणून त्यांचे महत्त्व आहे. नवा मजकूर वाचकांना भावेल असे वाटल्यावरून तो सुधारित आवृत्तीत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ‘आकाश संवाद'चे स्वरूप केवळ भाषण संग्रह न राहता आता ते भाषण व मुलाखत संग्रह झाले आहे.
 दूरदर्शनचा प्रभाव दृक्-श्राव्य माध्यम म्हणून वाढत, विस्तारत असला तरी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाच्या धारावाहिक कथा व कार्यक्रम हे मूल्य विचार रुजवितात असे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आकाशवाणी श्रव्य माध्यम म्हणून मूल्यवत्ता टिकवून आहे. त्यामुळेच श्रोत्यांना संस्कार नि दृष्टी देण्याची भूमिका टिकून आहे.
 श्राव्य भाषणे लिखित रूपात सादर करायची ती अधिक गांभीर्याने विचार कृतीत उतरावे म्हणून. ऐकण्याचा प्रभाव अल्पकालिक असतो. लिखित वारंवार संदर्भसाठी, पुनर्विचारासाठी उपयोगी पडते. ‘आकाश संवाद'चा खटाटोप त्याच एका उद्देशाने केला आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे