पान:अस्पृश्य -विचार.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

लक्ष जास्त वेधलें आहे. जो गृहस्थ आपल्याला पसंत व जरूर या राजकारणाविषयीं इतकं बोलतो च करतो तोच अस्पृश्यतेसंबंधानेही सांगू लागला म्हणजे त्याचे म्हणणे खरे आहे असे वा लागावें, त्या विषयाला कांहीं जातिवंत व स्वयंभू महत्त्व आहेसें पटावें व निदान स्थानमाहात्म्य म्हणून, सभागौरवासाठी म्हणून, मुग्ध नापसंतीनें ताठरलेली आपली मान बहुजनसमाजाने अलंकारिकरीत्या पसंति दाखविण्यासाठी डोलवावी हें बरोबर आहे पसंत अस की नसो, काँग्रेस व गांधी यांनी हा विषय गळ बांधला. हें खरें. आतां तो गळीं उतरावयाचा राहीला आहे. एकाद्या मोठ्या थोरल्या लोकप्रिय कंपनीने आपल्या आजपर्यंतच्या तपाचा फायदा घेऊन, अगर भावी यशाकडे व स्वार्थाकडे लक्ष देऊन, साधारणत: अप्रिय मजकुराचें चोपडे प्रसिद्ध केल्याने या चोपड्याचा प्रसार प्रसिद्धि आणि आदर ही जशीं आपोआपच प्राप्त होतात तसाच कांहसा प्रकार राष्ट्रीय सभेने अस्पृश्यतेच्या केलेल्या पुकाऱ्यात झालेला आहे. तिच्या बोजामुळे लोकांनीं आदरभावाने ऐकले व राजकारण हा जो तिचा पेशा त्यांत तेढ पडतां उपयोगी नाही अशा धोरणानें तिने सदुपदेश केला. महात्मा गांधी यांनी मात्र राजकारणापेक्षांहि आपल्याला उंच वाटणार्या धर्मबुद्धीनें प्रेरित होऊन या विषयाला उचल दिली.
  पण काँग्रेसनें व गांधींनी हा पुरस्कार करावयाच्या आधी आमच्या समाजाचे मन काय अगदीं स्वस्थच बसलें होतें? आमची प्रचंड लोकसंख्या ही कांहीं कांहीं प्रसंग मोठी गैरसोयीची आहे असें वाटू लागते. कारण आपत्तिनिवारणाच्या कामी एवढा मोठा डोंगर मानमांड करणारा वाटतो. पण तोच लोकसंख्येचा अफाटपणा उपययोजनेच्या, चिंतनाच्या आणि अंमलबजावणीच्या कामीं असंख्य मनांच्या असंख्य ठेवणीमुळे व सामथ्यमुळे कायात सुकरता