पान:अशोक.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोव-मुकादमानी. - ६३ राच्या गांवांतले कुणबी असल्या गांवांत जाऊन लागण करीत. जसा मुलकींत तसा दिवाणी फौजदारींतही मामलेदारांनीं धुडगूस घातला. ह्याप्रमाणें-देशमुख, देशपांड्ये, पाटील, कुळकर्णी, व इतर वतनदार, बलुतदार, ह्यांच्या कारस्थानांना व पंचांच्या न्यायाला आळा राहिला नाहीं. पक्ष धरून पाटील-कुळकर्णी व कारूनारू हे खोटींनाटीं कामें पुष्कळ करीत. गांवांत कोणीही कामगार व प्रवाशी आला आणि गांवांत कसलीही पंचाईत झाली कीं कारूनारू चावडीवर जमतात आणि अतिशय येई व येते. त्यामुळे हे लोक मोठे तिखट, चौघास, हजरजबाबी, आंगचुकवे व गुलाम झाले आहेत. पाण्यांत राहून माशांशीं वैर करू नये; आपल्याला ज्या लोकांत जन्म काढावयाचा त्यांच्या डोळ्यांवर येऊं नये ह्या भीतीचा गांवमुकादमांवर जो दाब असे तेवढाच काय तो लोकांना थोडाफार न्याय मिळवून देई. त्या वेळच्या काय आणि आतांच्या काय कुणब्यांच्या फिर्यादी म्हटल्या म्हणजे शेतमालाची व जनावरांची चोरी, जळीत, जनावरें मारणें, बांध, उरळ्या व वांटण्या वगैरे स्थावरच्या भानगडी-ह्या असत. कुणब्यांचें आयुष्य बहुतेक रानांत जात असल्यामुळे त्यांच्या बोलण्याचालण्यांत विशेष ठेपराई नसते, त्यांना सभाधीटपणा नसतो, आणि पुराव्याच्या खुब्याखाब्या व आडाखे माहीत नसतात. हे गुण गांवांत वापरणारे जे वतनदार कारूनारू व गांवकामगार ह्यांच्यामध्यें पुष्कळ उतरले. हक भिकण्यासाठीं त्यांना काळी पांढरी पायाखालींघालावी लागे. म्हणून त्यांच्या साक्षीवर काय ती कज्याची मदार असे, व त्यांनीं कुणब्याला चांगलेंच पोखरलें. पेशवाईचा लय व इंग्रजीचा उदय डोळ्यानें पाहिलेला गंगथडीचा परशराम शाहीर महणतोः लोहार, सुतार, कुंभार, परीट, बारा कारू, अडकले । त्यांना आडून कष्जा जिंकून बिन-संधीनें कोण आले ? ॥ नवाशक्याला काय पुसावे हजारो टाले टोले ? ।