पान:अशोक.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांव-मुकादमानी. या ६१ आणि त्यानें दावा कबूल केला तर दोन्ही घरीं दिवा लागेल असा निकाल देई. पाटील-कुळकण्यांना सळ घालतां आला नाहीं, तर वादीप्रतिवादींकडून पंचांकडे कज्या सौंपविल्याबद्दल राजीनामा,व पंचनिवाड्याप्रमाणें चालू असा प्रतिज्ञालेख ( कबूली) लिहून घेऊन पंचनिवाडा' अमलांत आणण्याबद्दल पाटील जामीन घेई; आणि पंचायतीकडे दावा सॅपवी. पंच बहुधा पक्षकारांच्या दर्जाचे आणि वाद उमजण्यासारखे-जसें जमाखचीं कामांत पेढीवाले, स्थावर वतनाचे कामांत देशमुख, देशपांड्ये-असे असत. जात-पंचायतींत ज्या त्या जातीचे लोक असत. पंचांत नांव येणें हें मोठं भूषण समजत. पंचांना पक्षकारांकड़नही कांहीं * हारकी ? ( हर्षानें दिलेलें बक्षीस ) प्राप्त होत असे. पक्षकारांचे कतबे, जाबजाबाब, व लेखी तोंडी पुरावा घेऊन पंच सारांश लिहून काढीत; त्यांत पुराव्याचा गोषवारा आणि शेवटीं निर्वीह (निवाडा) असे. पंचायत ज्या गांवांत भरे तेथील कुळकर्णी तिचें लेखी काम करी. जो दावा जिंकी तो सरकारांत हारकी किवा शेरणी व जो हरी तो गुन्हेगारी देत असे. पंच कोणाचेही बांधलेले चाकर नसल्यामुळे ते वक्तशीर जमत नसत व पंचायतीचें काम रेंगाळत चाले. निलोंभी पंच व नि:पक्षपाती साक्षीदार विरळा. मूठदाबीचा प्रकार जारी असल्यामुळे पुष्कळसे दावे पायरीपायरीनें थेट दरबारपर्यंत जात. ज्याच्या तर्फे निवाडा होई तो अमलांत आणण्यासाठीं तो प्रतिपक्षाकडे गोडीनें मागणें' करी, त्यानें दाद दिली नाहीं तर तगादा लावी, तगाददाराकङ्कन त्यार्च खाणेंपिणें बंद करी, त्याच्या डोक्यावर धोंडा देई व त्याला घरांत कोंडून । ठेवी; इतक्यानें वळलें नाहीं तर त्याच्या घरीं बहुधा ब्राह्मणाला धरणें बसवी. मागमागून थकला म्हणजे ब्राह्मण शिव्याशाप देई, आपली शेंडी खुटीला बांधी, डोक्यावर धोंडा घेई, किंवा अन्नपाणी वर्ज करी. ब्राह्मणाला याप्रमाणें यातना भोगण्याला लावून आपण मोठं पाप करतों अंमल खासगीतगाद्यानें झाला नाहीं तर पाटील मामलेदाराकडे दाद मागत.