पान:अशोक.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांव-मुकादमानी. ԿԱ9 दुमालेगांव व जमिनी वगैरेंचा आकार वजा घालून निव्वळ ऐन जमा आकारीत. याशिवाय बलुतें, मोहतफी, राबता, व जकात, वगैरे जमासुद्धां एकदंर आकार जमा धरून त्यांतून महालाचा मुशाहरा, मामलेदार, दरकदार, कारकून, शिबंदी ह्यांचा खर्च, देवस्थान, धमॉदाय, खैरात, व रोजींदार वगेरे सरकार-मंजूर खर्च वजा करून बाकी राहिलेल्या बेरजेपैकीं निवळ रसद सरकारास किती यावी व व्याज, हुंडणावळ, बट्टा वगैरे किती मुजरा द्यावयाचा याचा तपशील असे. मामलेदार ह्या आजमासाच्या धोरणानें वसल व खर्च करीत. बरसात लागली म्हणजे मामलेदार पाटलांला बोलावून घेत, व त्यांजकडून पड-लागणीचा तपशील व वसुलाचा इकरार करून घेत. देई, पड जमीन वहितीस लावी, नडलेल्या कुळांस मामलेदाराकडून तगाई व सावकारांकडून कर्ज मिळवून देई, व जुनें देणें तहकूब ठेवण्यासाठीं मधस्थी करी. पिकें आकाराला आलीं म्हणजे मामलेदार पाहणीला निघत आणि गांवगन्ना लोकांच्या तक्रारी-अर्ज यांचा इनसाफ करीत. ते शेकदारांच्या मदतीनें गांवचें दसर तपासीत. त्यांत लिहिलेला कमाल आकार, वसुली आकार, कमजास्त लावणी, आणि पाटील-कुळकर्णी, देशमुख-देशपांड्ये, व यचयावत् वतनदार ह्यांचें सूट-तहकुबीबद्दलचें म्हणणें, ह्या सर्वांचा विचार करून ते जमाबंदीचा ठराव करीत. पाटलानें तो मान्य केला कीं त्याला कबुला-कितबा देत. कोणी किती पट्टी द्यावयाची ह्याबद्दलचा पाटलाचा व रयतेचा ठराव यापूर्वीच झालेला असे. तो मामलेदारांनीं कबूल न केला तर पाटील पुन्हां रयतेचा विचार घेऊन तो मामलेदारांना कळवी. इतकंही करून दोघांचा मेळ न बसला तर मामलेदार ' बटाई' ठरवी, म्हणजे अर्धे उत्पन्न कुळानें ठेवावें व अर्धे संख्येवर महसूल ठरवीत. पूर्वीची जमाबंदी म्हणजे एके बाजूला सरकार’तर्फे मामलेदार व दुस-या बाजूला रयततर्फे पाटील,मिरासदार, कारूनारू,