पान:अशोक.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वतन-वृत्ति. R\s विरुद्ध आचरण केलें, जातिसंप्रदायावरुद्ध लग्र लावलें, प्रेतसंस्काराच्या प्रसंगीं मदत केली नाहीं, जमातीनें मागितलेली वर्गणी दिली नाहीं, एखाद्या मानाहचा उपमर्द केला, तर जात त्याला शासन करते व पावनही करते. जेथें एका जातींतील एक अगर अनेक व्यक्तींचा किंवा सबंध जातीचा संबंध दुसञ्या एक किंवा अनेक जातींशीं किंवा सबंध समाजाशीं अथवा राजाशीं पडे तेथें जातींतील विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा सबंध जातीबद्दल जबाबदारी अवघ्या जातीवर टाकीत, आणि जातगंगा ती पार पाडी. तथापि जेव्हां एखादा इसम माजून जातीला मोजीनासा होई, तेव्हां धर्माध्यक्षाकडे अगर राजाकडे धांव घेऊन त्यांचे मार्फत आज्ञा जी जात किंवा जातींतील व्याप्त उछेघी, तिचें पारिपत्य धर्माध्यक्ष राजाकडून करवीत. सारांश, ज्याप्रमाणें गांवक-यांच्या बहुतेक सर्व राजकीय, धार्मिक व सामाजिक कृत्यांची जोखीम गांवगाडा उचली, त्याचप्रमाणें जातभाईच्या कृत्यांचा जिम्मा जात घेई; आणि लोकांवर राजा व धर्माध्यक्ष ह्या दोघांपेक्षांही खराखुरा अंमल जातीचा व गांवाचा असे. ह्यामुळे प्रस्तुत काळीं ज्या अनेक गोष्टी खास राजसत्तेच्या म्हणून कायद्यानें ठरविल्या आहेत, त्यांचा निकाल जात व गांव पूर्वी आपल्या अधिकारांत करी. मागून चालत आलेल्या वळणावर लोक अजूनही त्या करावयास जातात, पण नकळत त्यांजकडुन कायदा-केव्हां केव्हां तर फौजदारी कायदा-मोडला जातो. पट्टी वसूल करण्याच्या कामीं स्वराज्याप्रमाणें पाटील कुलकर्णी नाठाळ कुळाच्या चुलींत कचित प्रसंगीं पाणी ओततात, किंवा त्याला अगर त्याच्या माणसांला 'विहीर बंद करतात. त्यांचें हें कृत्य गांवाला पसंत असतें. पण कुळानें फिर्याद केली तर कायद्याप्रमाणें पाटीलकुळकण्यांना शिक्षा करणें आधिका-यांना भाग पडतें. हिंदुस्थानांतील ख्रिस्ती लोकांच्या लग्रासंबंधानें १८७२ चा १५वा कायदा आहे. त्याचें ६८वें कलम असें आहे की, ह्या कायद्याप्रमाणें लम लावण्याचा आधकार नाहीं अशा इसमानें डिस्ट्रिक्ट मैरेज राज