पान:अशोक.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वतनं-वृत्तिः." २३ व्यवसाय, संप्रदाय, धर्ममत अगर उपासना ह्यांपुरता स्वतंत्र पंथ निघे, व अजूनही हेंच चाललें आहे. इतर व्यवहारांत सामान्य जात त्याला दूर धरीत नसे व नाहीं. परंतु अल्पसंख्याक समाज आपले हितास अतिशय जपतात असा नियम आहे, त्याप्रमाणें नवीन पंथच जातीच्या सामान्य हितापेक्षां आपल्या हिताकडे जास्त लक्ष देतात व वगळे होण्याचे तया कुलाचार पडत जाऊन ते कुलधर्म होऊन बसले; आणि एरवीं सर्व प्रकारें एक अशा कुळांत सुद्धां फूट पडली व बारा पुरभय्ये आणि चौदा चुली अशी समाजाची स्थिति झाली. जातींच्या किंवा पंथांच्या विभक्तपणाच्या सहस्रावधि कारणांचा शोध केला तर तो अतिशय बोधप्रद व मनोरंजक होईल, आणि त्याची छाननी करून त्यांतील तथ्यांश समाजापुढें सप्रमाण मांडला तर जातिभेदाची तीव्रता कमी करण्यास त्याचा पुष्कळ अगदीं वरवर पाहणाराला सुद्धां ही गोष्ट कबूल करावी लागेल कीं, ब्राह्मणादिकांच्या बहुतेक जाती वस्तिपरत्वें झाल्या:- मारवाडी ब्राह्मण, कोंकणी मराठा, गुजराती न्हावी, परदेशी कुंभार इत्यादि. ज्या ब्राह्मणांनीं नागवेलीचीं पानें खुडण्याचें टाकून दिलें नाहीं त्यांची तिरगुळ ब्राह्मण म्हणून एक पोटजात झाली. ज्या क्षत्रिय-वैश्यांनीं विधवावपन, पुनर्विवाह वगैरे चालू केले ते आपल्या वर्णबंधूंतून फुटून बाहेर पडले. गुरव, भोप्ये, गोंधळी, आराधी, भुत्ये, भराडी, डोरे गोसावी, वाघ्ये वगैरे पुजारी जातांचे भेद देवदेवतांवरून झालेले दिसतात. शंकराची पूजा प्रमुखत्वें गुरव करतात, तशी देवीची भोप्ये, गोंधळी, भुत्ये किंवा आराधी, भैरवाची जोतीबाची भराडी किंवा डॅरे गोसावी, 'खेडोबाची वाधे करतात. पिराला भजणारे व मानभावाचा अनुग्रह घेतलेले लोक ब्राह्मणेतर जातींत पुष्कळ आहेत, आणि त्यामुळे त्यांचे वेगवेगळाले पंथ झाले आहेत. पांचाळांकडे पाहतां सोनार, तांबट, कासार, लोहार, जिनगर, घिसाडी, ह्या जाती धातूंवरून पडल्या ` असाव्यात.